शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

डेव्हिस चषक, भारताची कोरियावर २-0 ने आघाडी

By admin | Published: July 15, 2016 9:16 PM

एकेरीचे सामने जिंकताना भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध डेव्हिस चषक आशिया ओशियाना झोन ग्रुप एक लढतीत २-0 अशी आघाडी मिळवून दिली.

ऑनलाइन लोकमत

चंदीगड, दि. 15 - युवा खेळाडू रामकुमार रामनाथन आणि अनुभवी साकेत मिनैनी यांनी येथे शुक्रवारी आपआपले एकेरीचे सामने जिंकताना भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध डेव्हिस चषक आशिया ओशियाना झोन ग्रुप एक लढतीत २-0 अशी आघाडी मिळवून दिली.भारत आणि कोरिया यांच्यादरम्यान ग्रासकोर्टवर खेळवल्या जाणाऱ्या या लढतीच्या पहिल्या एकेरीत २१ वर्षीय रामकुमारने अपेक्षेनुसार कामगिरी करताना कोरियाच्या सियोंग चांग होंग याचा २ तास ३६ मिनिटांच्या संघर्षपूर्ण लढतीत ६-३, २-६, ६-३, ६-५ अशी मात केली. कोरियन खेळाडूने चौथ्या सेटमध्ये पायाला क्रॅम्प आल्यामुळे सामन्यातून माघार घेतली. त्याचबरोबर भारताने १-0 अशी आघाडी मिळवली.दुसऱ्या एकेरी सामन्यात साकेत मिनैनी याने कोरियन खेळाडू योंग क्यू लिम याच्याविरुद्ध ६-१, ३-६, ६-४ आघाडी घेतली. तथापि, त्यानंतर साकेतदेखील क्रॅम्प आल्यामुळे कोर्टवर आदळला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केला आणि भारतीय संघाने हा गेम सोडण्याचा निर्णय घेतला. हा सेट ६-३ असा कोरियाने जिंकला. साकेतने दुखापतीमुळे टाईम आऊट घेतला आणि निर्णायक सेटमध्ये त्याने आपल्या शक्तिशाली सर्व्हिसचा फायदा घेताना ५-२ अशी आघाडी घेतली. या सेटमध्ये त्याचा कोरियन प्रतिस्पर्धी त्रस्त दिसला आणि लिमने २-५ अशा पिछाडीनंतर या लढतीतून माघार घेतली. अशा प्रकारे भारताने या लढतीत २-0 अशी आघाडी घेतली.शनिवारी दुहेरीत लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना या अनुभवी जोडीसमोर होंग चुंग आणि युनसियोंग चुंग यांचं आव्हान असणार आहे. भारताची जोडी ही लढत जिंकून भारताला ३-0 अशी निर्णायक आघाडी मिळवून देईल, अशी आशा बाळगली जात आहे. ही लढत जिंकल्यास भारत विश्व ग्रुप प्लेआॅफसाठी पात्र ठरणार आहे. त्याच प्रमाणे या लढतीत विजय मिळवल्यास रविवारी होणारे दोन्ही एकेरीच्या सामन्यात फक्त औपचारिकताच बाकी असेल.जागतिक २१७ व्या रँकिंगच्या रामकुमारसमोर ४२७ वे मानांकन असणारा चाँगने कडवी झुंज दिली आणि पहिला सेट गमावल्यानंतर त्याने दुसरा सेट ६-२ असा जिंकताना बरोबरी साधली; परंतु सामन्यादरम्यान मांडीच्या दुखापतीमुळे तो पिछाडीवर पडला आणि नंतर मुसंडी मारू शकला नाही. पावसाचाही ग्रासकोर्टवर परिणाम दिसला. तेथे आर्द्रतेमुळे कोर्टवर खेळणे खेळाडूंना कठीण झाले.अशीच परिस्थिती दुसऱ्या सामन्यातदेखील होती. १५0 व्या रँकिंगच्या साकेत आणि ६२६ व्या रँकिंगच्या लिम या दोघांनाही कोर्टवर समस्येला सामोरे जावे लागले; परंतु साकेतने दुखापतीनंतरही धीरोदात्त व सुरेख खेळ केला. त्यामुळे भारताला दोन्ही सामने जिंकता आले. या लढतीत दवाचाही परिणाम खेळाडूंच्या खेळावर दिसला व त्यामुळे खेळाडूंना खेळताना समस्या आली.