शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

विराटने ऐनवेळी घेतला होता फिल्डिंगचा निर्णय

By admin | Published: June 22, 2017 12:08 PM

टीम मीटिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करण्यावर एकमत झालं असतानाही विराट कोहलीने मैदानावर ऐनवेळी निर्णय बदलत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत पाकिस्तानने केलेला दारुण पराभव भारतीयांच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे. भारतीय संघाच्या इतक्या खराब कामगिरीवर सर्व स्तरातून जोरदार टीका होत आहे. मात्र या पराभवामागे कर्णधार विराट कोहलीने ऐनवेळी घेतलेला निर्णय असल्याचं बोललं जात आहे. टीम मीटिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करण्यावर एकमत झालं असतानाही विराट कोहलीने मैदानावर ऐनवेळी निर्णय बदलत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा नेमका हाच निर्णय संघाच्या पथ्यावर पडला, आणि एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
(कुंबळेची विकेट काढली, कोहली आता करून दाखव !)
(‘विराट’ वाद; कुंबळेला विरोध करणाऱ्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवा)
(प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा बीसीसीआयचा निर्णय)
 
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीचा हा निर्णय ऐकताच प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आश्चर्याचा धक्काच बसला. विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर कुंबळेने विराटकडे याबद्दल विचारणा केली. यावर विराट कोहलीने उलट उत्तर दिलं. यामुळे भारतीय संघामधील वातावरण बिघडलं, आणि त्याचा परिणाम खेळावर पहायला मिळाला. ज्यामुळे अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला. 
 
याआधी जेव्हा सुरुवातीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला होता, तेव्हा भारताने प्रथम फलंदाजी करत 319 धावा केल्या होत्या. यानंतर मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला भारतीय संघाने 164 धावांवर ऑल आऊट केलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची ढिसाळ फलंदाजी पाहता अंतिम सामन्यात एक मोठी धावसंख्या उभारली असती, तर त्याचा पाठलाग करणं त्यांना कठिण गेलं असतं.
 
यामुळेच भारतीय संघ व्यवस्थापनाने अंतिम सामन्यात टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विराटने निर्णयाला बगल देत प्रथम गोलंदाजी करत असल्याचं जाहीर करुन टाकलं. उरली सुरली कसर विराट कोहलीने कुंबळेला उलट उत्तर देत भरुन टाकली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडलं, ज्याचा परिणाम खेळावर झाला. 
 
अंतिम सामन्यात फखर जमानने केलेल्या शतकाच्या आधारे पाकिस्तानने 338 धावांचा डोंगर उभा केला होता. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानने फक्त 158 धावांत गारद केलं, आणि 180 धावांनी दणदणीत पराभव केला.