शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

सर्व स्तरांतून समर्पण आवश्यक : गोपीचंद

By admin | Published: October 24, 2016 4:19 AM

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सर्व स्तरांतून समर्पण आवश्यक असते, असे मत माजी दिग्गज बॅडमिंटनपटू व आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावित इतिहास

नागपूर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सर्व स्तरांतून समर्पण आवश्यक असते, असे मत माजी दिग्गज बॅडमिंटनपटू व आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावित इतिहास घडविणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे मार्गदर्शक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. रविवारी आयोजित एसजेएएन-रायसोनी अचिव्हर्स वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरण समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून ते नागपुरात आले होते. त्या वेळी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. सन २००१मध्ये आॅल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावित प्रकाश पदुकोणनंतर अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय बॅडमिंटनपटू ठरलेले गोपीचंद म्हणाले, ‘‘खेळाडू घडविणे सोपे नसते. यश मिळवण्यासाठी सर्व स्तरांतून समर्पण असणे आवश्यक असते. खेळाडू, प्रशिक्षक, पालक या सर्वांच्या समर्पणासोबत परमेश्वराची कृपा असणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास पी. व्ही. सिंधूच्या आईने रेल्वेतील नोकरीचा त्याग केला आणि आॅलिम्पिकपूर्वी तिच्या वडिलांनी मुलीच्या मदतीसाठी दोन महिन्यांची रजा घेतली.’’गोपीचंद यांनी सांगितले, ‘‘भारतात प्रतिभेची वानवा नाही. खेळाडूंना सुविधा मिळाल्या आणि त्यांनी मेहनत घेतली तर अनुकूल निकाल मिळवता येतील.’’हैदराबादमध्ये विश्व दर्जाची अकादमी चालविणारे गोपीचंद पुढे म्हणाले, ‘‘२००८पासून भारताचा बॅडमिंटनचा आलेख सतत उंचावत आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये खेळाडू चांगले निकाल देत आहेत. सिंधूने आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकाविल्यानंतर भारतीय बॅडमिंटनचे चित्र पालटण्यास मदत झाली आहे. सध्या भारतीय बॅडमिंटन चांगल्या स्तरावर आहे.’’पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी गोपीचंद यांनी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची प्रशंसा करताना सांगितले, ‘‘दर्जेदार खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी तळागाळातील खेळाडूंसाठी काही योजना राबविणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सातत्याने खेळांवर बोलत असतात. त्यांचा क्रीडा क्षेत्रात चांगला प्रभाव पडला. खेळाच्या विकासासाठी काही चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. काही कॉर्पोरेट खेळाच्या विकासासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत असून, हे चांगले चित्र आहे.’’विदेशी प्रशिक्षकाच्या मुद्यावर बोलताना गोपीचंद म्हणाले, ‘‘विदेशी प्रशिक्षकांसाठी काही मापदंड ठेवण्यात आलेले नाहीत. दीर्घ काळाचा विचार करता देशातच दर्जेदार प्रशिक्षक घडविणे आवश्यक आहे.’’ (क्रीडा प्रतिनिधी)