शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोलंदाज ठरणार निर्णायक

By admin | Published: May 30, 2017 12:57 AM

काही दिवसांमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. भारत या स्पर्धेत गतविजेता असून पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवले

काही दिवसांमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. भारत या स्पर्धेत गतविजेता असून पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवले. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे जरी भारताने विजय मिळवला असला तरी, माझ्या मते हा चांगला विजय ठरला. कारण, एक तर हा सराव सामना होता, त्यात न्यूझीलंडसारख्या संघाला १८९ धावांमध्ये बाद करणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. भारत विजयापासून ६० धावा दूर असताना पावसाने हजेरी लावली आणि जास्त बळीही गमावले नव्हते. सर्वांत चांगली बाब म्हणजे विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले.कोहलीला आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेत फार काही चमक दाखवता आली नव्हती. तसेच, त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्येही लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. अशा घडामोडीनंतर पहिल्याच सामन्यात जर कोहली धावा काढत असेल, तर स्वत:सह संघाचाही आत्मविश्वास वाढतो. तसेच कोहलीसारखा मोठा खेळाडू फॉर्ममध्ये आल्यानंतर प्रतिस्पर्धी संघावर खूप मोठा परिणाम होतो. पण एकूणच कामगिरी पाहिल्यास सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, भारताची गोलंदाजी जबरदस्त झाली. ५ वेगवान गोलंदाज, २ फिरकी गोलंदाज असा ताफा असलेल्या भारतीय संघाचे जवळपास सर्वच गोलंदाज यशस्वी ठरले. महंमद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार या प्रमुख गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे गोलंदाज भारतासाठी खूप निर्णायक ठरेल, असे मला वाटते.गोलंदाजी यासाठी निर्णायक ठरेल, कारण विदेशात जिंकलेल्या गेल्या तीन एकदिवसीय विजेतेपदांची कामगिरी पाहिल्यास कळेल, की गोलंदाजांमुळे टीम इंडिया यशस्वी झाली आहे. १९८३ चा विश्वचषक कपिलदेवच्या नेतृत्वामध्ये जिंकला, तेव्हा सर्वांना कपिलच्या नाबाद १७५ धावांची खेळी आठवते. पण आपण हे विसरतो, की अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजला ४० धावांनी नमवले. १८३ सारख्या छोट्या धावसंख्येचे भारतीयांनी यशस्वी संरक्षण केले होते. गोलंदाजांनी तेथे यश मिळवले होते. मदनलाल, कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, रॉजर बिन्नी यांसारख्या गोलंदाजांनी बाजी मारली.यानंतर, १९८५ मध्ये वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये जर तुम्ही पाहिले तर कळेल, तिथेही गोलंदाज चमकले होते. विश्वचषकविजेत्या गोलंदाजांसोबत चेतन शर्मा, शिवरामकृष्णन, रवी शास्त्री यांची भर पडली होती. या गोलंदाजांच्या जोरावर भारताने अंतिम सामना जिंकला होता. यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील भारताने गोलंदाजांच्या जोरावरच जिंकली होती. ५ सामन्यांत ५० पैकी ४५ बळी मिळवण्यात भारताला यश आले होते. यावरुनच गोलंदाजांचे यश लक्षात येते. कारण, विदेशी वातावरण असे असते जेथे गोलंदाजांना खूप मदत मिळते. त्यामुळे गोलंदाजीमध्ये विविधता, चांगले पर्याय असणे खूप महत्त्वाचे ठरते. तसेच, गोलंदाजांची कामगिरीही चांगली होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मला वाटते, या वेळी निवडकर्त्यांनी खूप चांगले काम केले आहे. सध्याच्या भारतीय संघात गोलंदाजीसाठी अनेक पर्याय असून आपले गोलंदाज चांगल्या लयीमध्ये आहेत.

- अयाझ मेमन -(संपादकीय सल्लागार)