शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

आता मागे वळून पाहणार नाही - विराट कोहली

By admin | Published: March 07, 2017 7:12 PM

पहिली कसोटी गमावल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं तेच आम्ही केलं. आम्हाला मालिकेत पुनरागमन करायचं होतं आणि दुसरं कोणाला नाही तर आम्हाला स्वतःला सिद्ध करायचं होतं.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - ''पहिली कसोटी गमावल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं तेच आम्ही केलं. आम्हाला मालिकेत पुनरागमन करायचं होतं आणि दुसरं कोणाला नाही तर आम्हाला स्वतःला सिद्ध करायचं होतं'', असं बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव केल्यानंतर विराट कोहली म्हणाला. 
 
''सर्वांनी स्वतःची जबाबदारी ओळखण्याची गरज असते तेच आमच्या खेळाडूंनी केलं. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू शकतो हा खेळाडूंचा विश्वास होता. मेच पाहायला आलेल्या प्रेक्षकांनीही आमची साथ दिली. ऑस्ट्रेलियाचा संघ दुस-या डावामध्ये मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला त्याचवेळी सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो हे आम्हाला समजलं होतं. 150 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य दिलं तरी आपण पुनरागमन करू शकतो हा विश्वास होता. अजिंक्य रहाणे आणि पुजारामध्ये झालेली भागीदारी महत्वाची होती. शेवटच्या विकेटसाठी इशांत आणि साहामध्ये झालेली भागीदारी आमच्यासाठी बोनस ठरली. 187 धावांचं लक्ष्य दिलं तेव्हा कशी गोलंदाजी करायची आहे हे आम्हाला माहित होतं. आम्हाला हा सामना आजच संपवायचा होता. रांचीमध्ये होणा-या तिस-या कसोटीसाठी आम्ही आतूर आहोत, आता मागे वळून पाहणार नाही'', असं  मॅच संपल्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये बोलताना विराट कोहली म्हणाला.  
 
बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करून भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधून पुनरागमन केले.