शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

विंडीजवर वर्चस्व गाजवू : अश्विन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2016 2:24 AM

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आम्ही वर्चस्व गाजवू, असा आशावाद अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केला आहे.

बासेटेरे : वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आम्ही वर्चस्व गाजवू, असा आशावाद अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केला आहे. अश्विन म्हणाला,‘पहिल्या सराव सामन्यादरम्यान विंडीजच्या फलंदाजीचा मला वेध आला. गेल्या दोन वर्षांत या संघाने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली आहे. त्यांच्यावर दडपण आणून पहिल्या डावात आघाडी संपादन करणे टीम इंडियाचे लक्ष्य असेल. विंडीजमधील मंद होत असलेल्या खळपट्ट्यांवर अचूक फिरकी मारा करणे सोपे नाही, पण आम्हाला यात यश येईल, हे निश्चित.’उकाडा आणि मंद खेळपट्ट्या या येथील मुख्य समस्या असल्याचे सांगून अश्विन पुढे म्हणाला,‘येथील हवामानाशी एकरूप होऊन अधिक काळ मारा करण्यास आम्हाला सज्ज व्हावेच लागेल. विंडीजकडे फलंदाजांची चांगली फळी आहे. शिवाय चेंडू आणि बॅटने योगदान देणारे अनेक अष्टपैलू संघात आहेत. विंडीजवर विजय मिळविण्यासाठी सुरुवातीला मिळालेल्या यशाचे विजयात रूपांतर करणे हे धेय्य आखावे लागेल. ‘संयम’ ही यशाची गुरुकिल्ली असेल. विकेट मंद असतील पण गोलंदाजांना बळी घेणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी संयमाने मारा करावा लागणार आहे.’ मागच्या सामन्यात अमित मिश्राने १५-१६ षटके गोलंदाजी केल्यानंतरच त्याला बळी घेणे शक्य झाले, याकडे अश्विनने लक्ष वेधले. आतापर्यंत ३२ कसोटीत सहा अर्धशतके ठोकणारा अश्विन फलंदाजी कोच संजय बांगरसोबत स्वत:च्या फलंदाजीवर मेहनत घेत आहे. अखेरच्या टप्प्यात धावा काढून संघाला मोठी धावसंख्या उभारून देणे आपले उद्दिष्ट असल्याचे अश्विनने स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)कुंबळेंच्या टीप्स मोलाच्याकोच अनिल कुंबळे हे गोलंदाजांच्या मनातले जाणतात. योग्यवेळी ते योग्य सल्ला देतात.चांगला मारा करीत असाल तरी विकेट मिळत नसेल तर ते खांद्यावर हात ठेवून पुढे कसा मारा करायचा याबद्दल मार्गदर्शन करतात. गोलंदाजाचे स्वत:चे मत ते जाणून घेतात आणि मित्रासारखे वागत असल्याने त्यांच्याकडून बरेच शिकायला मिळते,असे अश्विन म्हणाला.