शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

भारतीयांचा स्वप्नभंग...

By admin | Published: April 01, 2016 4:17 AM

गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न धुळीस मिळाले. लेंडल सिमन्स याने नाबाद ८३ धावांनी स्फोटक खेळी करीत सव्वाशे कोटी भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.

- शिवाजी गोरे, रोहित नाईक : मुंबई

गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न धुळीस मिळाले. लेंडल सिमन्स याने नाबाद ८३ धावांनी स्फोटक खेळी करीत सव्वाशे कोटी भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. त्याच्या व जॉन्सन चालर््स (३६ चेंडूत ५२) तसेच आंद्रे रसेल (२० चेंडूत नाबाद ४३) यांच्या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजने भारताचे १९३ धावांचे आव्हान पार करून सेमी फायनल जिंकली. कोहलीची ६३ चेंडूंतील नाबाद ८९ धावांची खेळी व्यर्थ ठरली. २ बाद १९२ अशी धावसंख्या उभारली तेव्हा भारत ही लढत सहज जिंकेल, असे वाटत होते. गेलचा (५) अडसर बुमराने दूर करताच जल्लोषाला उधाण आले होते. मात्र, सिमन्स, रसेल व चालर््स या त्रिकुटाच्या फटकेबाजीने भारताचा विजय हिरावला. १९.४ चेंडूत ३ बाद १९६ धावा करून विंडीजचे फायनलचे तिकिट बुक केले. विंडीज फलंदाजांनी तब्बल २० चौकार आणि ११ षटकांरांची आतषबाजी करीत भारतीय गोलंदाजी निष्प्रभ केली. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान असेल.- टी२० विश्वचषकच्या बाद फेरीत वेस्ट इंडिजने पाठलाग केलेल्या सर्वोच्च धावा. याआधी आॅस्टे्रलियाने २०१० साली पाकविरुध्द १९२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.- सर्वाधिक १६ वेळा कोहलीने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा काढल्या आहेत. गेल आणि ब्रेंडन मॅक्क्युलमने प्रत्येकी १५ वेळा अशी कामगिरी केली.- टी२० विश्वचषकात विंडिजने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. या सामन्यासह भारताने स्पर्धेत ५ पैकी ४ नाणेफेक गमावल्या. - कोहलीने केलेल्या धडाकेबाज ८९ धावांच्या जोरावर टीम इंडियाने टी २०च्या उपांत्य सामन्यात विंडिजपुढे २ बाद १९२ धावांचे विराट आव्हान उभे केले. मात्र ही त्याची खेळी व्यर्थ ठरली.- आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या लिंडल सिमन्सची ‘घरच्या मैदानावर’ निर्णायक फटकेबाजी. त्याने ५१ चेंडूत ८२ धावा तडकावल्या.- ईडन गार्डन्सवर ३ एप्रिलला होणाऱ्या अंतिम सामन्यात विंडिजसमोर बलाढ्य इंग्लंडचे आव्हान असेल.