शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

'सन्मानामुळे वाढली जबाबदारी, उत्कृष्ट कामगिरीच्या अपेक्षाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 01:31 IST

पद्मश्रीचे मानकरी गौतम गंभीर, सुनील छेत्री, बजरंग पुनिया यांनी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली : गौतम गंभीर क्रिकेटरपासून ‘भला माणूस’ बनू इच्छितो. सुनील छेत्रीमध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघातून खेळताना आणखी मोठी कामगिरी करण्याची भूक कायम आहे. मल्ल बजरंग पुनिया याने याहून मोठी कामगिरी करण्यासाठी देशवाासीयांचे आशीर्वाद मागितले आहेत.केंद्र शासनाने ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला क्रीडा क्षेत्रातील या दिग्गजांच्या कामगिरीचे कौतुक म्हणून पद्मश्री सन्मान जाहीर केला. या खेळाडूंनी पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याची भावना टिष्ट्वटरद्वारे व्यक्त केली आहे. दोनदा विश्वचॅम्पियन बनलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य राहिलेला गौतम गंभीर टिष्ट्वट करीत म्हणाला,‘हा असा सन्मान आहे, ज्याचा आभारासह स्वीकार करतो. या सन्मासोबतच जबाबदारी येते. मी त्या दिवसासाठी जगत आहे, ज्या दिवशी माझ्यातील भला माणूस क्रिकेटपटूला मागे टाकेल तो माझा दिवस असेल. त्या दिवशी मी स्वत:ला पुरस्कृत करेन.’राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार छेत्रीने टिष्ट्वट केले,‘ माझे कुटुंबीय आणि चाहते या सन्मानाचे हकदार ठरतात. मात्र सध्यातरी निवृत्तीचा इरादा नाही. कृतज्ञ होण्याचे आणखी एक कारण मिळाले. अनेक वर्षे साथ देणारे सहकारी खेळाडू, कोचेस, स्टाफ, मसाजर, फिजियो, आणि व्यवस्थापन या सर्वांचा हा पुरस्कार आहे. मला नेहमी प्रेरित करणारे आई, वडील, बहिणी आणि मित्रांना पुरस्कार समर्पित करतो. देशासाठी खेळणे सुरू राहणार आहे. देश आणि क्लबसाठी खेळताना मैदानावर पाय ठेवेन त्यावेळी माझ्यातील चांगल्या कामगिरीची भूक आणखी वाढलेली असेल. दरदिवशी चांगला माणूस बनण्याचे प्रयत्न देखील सुरूच राहणार आहेत.’आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता मल्ल बजरंग पुनियाने लिहिले,‘ प्रतिष्ठेच्या पद्म सन्मानाने गौरव होणे माझ्यासाठी फार मोलाची बाब आहे. चाहत्यांचे प्रेम आणि माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या हातात हा सन्मान आला.आपल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी आणखी कठोर सराव करणार आहे. मला प्रेरणा आणि आशीर्वाददेत राहा.’ (वृत्तसंस्था)हा सन्मान‘खास’: शरथ कमलदोनदा पद्म पुरस्कारापासून वंचित राहिलेला दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरत कमल याने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘सुवर्णमय’ कामगिरीमुळे हा सन्मान मिळाल्याचे म्हटले आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी‘खास’ असल्याचे शरत म्हणाला.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरत म्हणतो,‘ हा माझा पहिला नागरी सन्मान आहे.काल रात्री बातमी कळली तेव्हा मित्रांसोबत होतो. फोनची बॅटरी डाऊन झाली होती. घरी परतलो तेव्हा आनंदाचे वातावरण होते. मागच्या वर्षीच्या कामगिरीच्या बळावरच हा सन्मान मला मिळू शकला.’जकार्ता आशियाडमध्ये टेबल टेनिसमधील ६० वर्षांचा दुष्काळ संपविताना शरतने जपानला नमवून भारतीय पुरुष संघाला कांस्य जिंकून दिले शिवाय मनिका बत्रासोबत मिश्र दुहेरीचेही कांस्य पटकविले होते. नव्या विश्व टेटे क्रमवारीत शरत सर्वोत्कृष्ट ३० व्या स्थानावर आला. याच महिन्यात त्याने नववे जेतेपद पटकवून राष्टÑीय जेतेपदाचा कमलेश मेहतांचा विक्रम देखील मागे टाकला.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरSunil Chhetriसुनील छेत्री