शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

ललिता, टिंकू, सुधाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

By admin | Published: July 14, 2016 2:56 AM

रियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये कोणता खेळाडू पदक जिंकेल, याचा अंदाज आत्ताच बांधणे चुकेची होईल.

बंगळुरू : रियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये कोणता खेळाडू पदक जिंकेल, याचा अंदाज आत्ताच बांधणे चुकेची होईल. परंतु, ललिता बाबर, टिंकू लुका आणि सुधा सिंह या धावपटू त्यांच्या-त्यांच्या क्रीडा प्रकारांत अंतिम फेरीपर्यंत मजल मारतील अशी आशा वाटते, असे भारताची माजी आॅलिम्पियन पी. टी. उषाने वृत्तसंस्थेस सांगितले. ग्रांप्री अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या निमित्ताने उषा बंगळुरू येथे आली असता, तिने वरील व्यक्तव्य केले. भारतीय आॅलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या देशातील अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. त्यामुळे कोणता खेळाडू कशी कामगिरी करील, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. सर्व खेळाडू चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील असणार आहेत. प्रत्येकाचे प्रथम लक्ष्य अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे, हे असणार आहे. पदकांचा अंदाज एवढ्यातच वर्तविणे योग्य नाही. कारण कोणत्या खेळाडूचा खेळ त्या वेळेच कसा होईल, हे त्या दिवशीच कळेल. लांब पल्ल्याच्या धावपटू ललिता बाबर (३ हजार मीटर स्टिपलचेस), सुधा सिंह (३ हजार मीटर स्टिपलचेस) आणि मध्यम पल्ल्याची धावपटू टिंकू लुका (८०० मीटर धावणे) या अंतिम फेरीसाठी पात्र होऊ शकतात. कारण त्यांच्या गटात धावणारे इतर देशांच्या धावपटूंनी त्याच्या पात्रता शर्यतीत दिलेली वेळ आणि आपल्या भारतीय धावपटूंची सध्याची वेळ यात खूप काही अंतर नाही. काही सेकंदांचा फरक आहे. या तिन्ही खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी पदकेसुद्धा जिंकली आहेत. त्यामुळे त्यांना आॅलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव कमी पडेल, असे होणार नाही. त्या चांगली कामगिरी करू शकतात. पुरुष व महिलांचा रिले संघसुद्धा चांगली कामगिरी करू शकतो. त्याच्या एकमेकांमध्ये चांगला समन्वय निर्माण झाला आहे. त्याचा त्यांना खूप फायदा होणार आहे. रंजी महेश्वरीसुद्धा अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्याचबरोबर द्युतीचंदकडून अपेक्षा करता येईल १०० मीटरमध्ये ११.२१ सेकंदांची वेळ नोंदविली, तर ती उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकते. तिने आता ११.२६ सेकंदांची वेळ नोंदविली आहे. (वृत्तसंस्था)