शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा!

By admin | Published: March 14, 2016 12:04 AM

जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आणावे लागणार आहे. त्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवा. आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा, असा सूर राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेत उमटला.

जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आणावे लागणार आहे. त्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवा. आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा, असा सूर राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेत उमटला.
आदिवासी एकता परिषदेच्या वतीने रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मेहरूण परिसरातील शिवाजी उद्यानात राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सुभाष नाईक होते. तर आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक तथा ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.महेश मोरे, जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, महानगराध्यक्ष करण सोनवणे, कार्याध्यक्ष आत्माराम पवार, सचिव डोंगर बागुल, आदिवासी तडवी भिल्ल मंचचे उपाध्यक्ष इब्राहीम तडवी, उत्तम निकम, जिल्हा सचिव जया सोनवणे, धनसिंग ठाकरे, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमित तडवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून परिषदेचे उद्घाटन झाले. त्यानंतर सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जया सोनवणे यांनी केले.
या विषयांवर झाले परिषदेत मंथन
आदिवासी बांधवांकडून बेकायदेशीररीत्या हस्तांतरीत केलेल्या जमिनी त्यांना सन्मानपूर्वक परत करण्यात याव्यात, आदिवासी व वनविभाग क्षेत्रासह गैर आदिवासी क्षेत्रातील धरण व जलाशयांचे अधिकार आदिवासींना देण्यात यावेत, शेतीच्या उद्देशाने आदिवासींनी शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे, २४ डिसेंबर १९९६ रोजी भुरिया समितीने केलेल्या पेसा संदर्भातील शिफारसींमध्ये कोणताही बदल न करता त्या त्वरित लागू कराव्यात, प्रत्येक भूमिहीन आदिवासीला किमान ५ एकर जमीन द्यावी, अशा विषयांवर परिषदेत मंथन झाले.
आदिवासी संस्कृती सर्वश्रेष्ठ : वाहरू सोनवणे
आदिवासी संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. या प्राचीन संस्कृतीवर गैर आदिवासींकडून अतिक्रमण केले जात आहे. हे अतिक्रमण आपल्याला रोखायचे आहे. गैर आदिवासींमुळे खर्‍या आदिवासींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. आदिवासींना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हे स्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत वाहरू सोनवणे यांनी व्यक्त केले.