शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

फ्लायवेट विरुद्ध हेविवेट

By admin | Published: June 06, 2017 5:04 AM

चॅम्पियन्स चषकातील भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी खूपच उत्सुकता निर्माण केली गेली

- अयाझ मेमन चॅम्पियन्स चषकातील भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी खूपच उत्सुकता निर्माण केली गेली होती. दोन्ही संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. दोन्हींच्या लढतींचा इतिहास मोठा आहे. आकडेवारी रंजक आहे. त्यामुळे हा सामनाही मोठ्या ईर्ष्येने खेळला जाणार असे वाटत होते; परंतु प्रत्यक्षात सामना खूपच एकतर्फी झाला, पण हे अनपेक्षित नव्हते. यापूर्वीही मी म्हटले होते की, दोन्ही संघांत अंतर खूपच मोठे आहे. गुणवत्ता असो किंवा अलीकडील काळातील कामगिरी असो, दोन्ही संघांत कोणतीच तुलना होऊ शकत नव्हती. भारत खूपच बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो, तर पाकिस्तान त्यामानाने खूपच दुबळा संघ भासतो. रविवारच्या सामन्यातून हेच सिद्ध झाले. खूपच एकतर्फी लढत झाली. जर बॉक्सिंगच्या भाषेत सांगायचे झाल्यास फ्लायवेट विरुद्ध हेविवेट अशी ही लढत झाली. या सामन्यात कोण जिंकणार हा प्रश्नच कधी पडला नाही. प्रश्न असा पडला की, भारत किती अंतराने जिंकणार? एकदिवसीय सामन्यात १२४ धावांचे अंतर खूप मोठे मानले जाते. आतापर्यंतची एकूण आकडेवारी पाहिली तर पाकिस्तानची सरशी दिसते; परंतु अलीकडील काळातील आकडेवारी संपूर्ण त्यांच्या विरोधात दिसून येईल. भारताविरुद्ध आम्ही त्वेषाने लढून जिंकू ही पाकिस्तानी संघाची धारणा आता बदलण्याची वेळ आली आहे. कारण तुमच्याकडे जिंकण्यासाठी गुणवत्ता नाही, जोशपूर्ण उगवते युवा खेळाडू असले पाहिजेत, त्याचप्रमाणे संघात अनुभवी खेळाडूंही पाहिजेत. एकूणच संघ सर्वच पातळीवर परिपूर्ण असला पाहिजे. केवळ उन्माद दाखवून सामना जिंकता येत नाही. पाकिस्तान संघाचा दर्जा सध्या खालावला आहे. त्यांनी कमजोर कामगिरी केली असली तरी भारतीय संघाला विजयाचे श्रेय दिलेच पाहिजे. सामन्यापूर्वी भारतीय संघाबाबत अनेक प्रश्न उठवण्यात आले होते, जे ‘आयपीएल’मधील कामगिरीवर आधारित होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे भारतीय संघाने आपल्या कामगिरीने दिली आहेत. भारताची सलामी जोडी चालेल का? रोहित शर्माचा फॉर्म आहे का? युवराजची निवड का केली? त्याला खेळवणार का? खेळवणार असतील तर का खेळवणार? असे प्रश्न संघाच्या फलंदाजीसंदर्भात उठले होते. त्या सर्वांची चोख उत्तरे मिळाली. रोहित शर्माने सुंदर खेळी केली. शिखर धवनसोबत त्याने चांगली पायाभरणी केली. त्यामुळे पुढील फलंदाजांना मनसोक्त फलंदाजी करता आली. युवराज सिंगनेही जबरदस्त खेळी केली. विराट-रोहित खेळत असताना भारताची धावगती एकदम कमी झाली होती. पाकिस्तानी गोलंदाजांनी आपला फास आवळण्यास सुरुवात केली होती. याचवेळी युवराजने आपल्या अनुभवाचा फायदा घेत पाकिस्तानी गोलंदाजीवर घणाघात केला. तेथून सामना भारताच्या बाजूने वळला तो कायमचाच. म्हणूनच त्याला ‘सामनावीर’चा पुरस्कार देण्यात आला. तो आणि विराट सुरुवातीला काहीवेळ चाचपडत आहेत असे वाटले; परंतु नंतर त्यांनी जी फलंदाजी केली, त्याला तोड नाही. हार्दिक पांड्याने युवा खेळाडूंमधील टॅलेंट दाखवून देताना फिनिशिंग कसे असावे याचा परिपाठ घालून दिला. धोनी, जडेजा, केदार यांना फलंदाजी करण्याची वेळ आलीच नाही. यातून भारतीय फलंदाजी किती मजबूत आहे हे सिद्ध झाले.गोलंदाजीतही जडेजा, भुवनेश्वर, उमेश, बुमराह यांनी आपआपल्या परीने योगदान दिले. जडेजाचे कौतुक करायला हवे. कारण त्याने गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणात आपली चमक दाखवून दिलीे. एकूणच सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळाला. जाता-जाता एक इशारा : विजयाची हवा डोक्यात जाऊ देता कामा नये. कारण आता फक्त एकच सामना जिंकलाय. अजून स्पर्धा जिंकलेली नाही. आता एक पाऊल टाकले आहे. पुढची वाटचाल आणखी दमदारपणे करायची आहे.( लेखक संपादकीय सल्लागार आहेत)