शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ

By admin | Published: July 18, 2016 6:22 AM

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ तसा हॉकी; पण त्या खेळाचा विसर सध्या भारतीय क्रीडाप्रेमींना पडला आहे.

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ तसा हॉकी; पण त्या खेळाचा विसर सध्या भारतीय क्रीडाप्रेमींना पडला आहे. क्रिकेटने सर्वांवर जादू केली आहे. पण क्रिकेट हा खेळ आॅलिम्पिकमध्ये नाही, याचीसुद्धा सर्वांना कल्पना आहे. आॅलिम्पिक म्हटले, की जगातील क्रीडापटूंना एक कुंभमेळा वाटतो. प्रत्येक देशातील विविध खेळांचे खेळाडू पदक जिंकून आपल्या देशाचा ध्वज तेथे फडकाविण्यासाठी जिवाची बाजी लावतात. प्रत्येक देश आपला सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सांघिक प्रकारासाठी सर्वश्रेष्ठ संघ निवडत असतो. अशा या आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने निर्विवाद वर्चस्व राखले होते. आॅलिम्पिकमध्ये हॉकी साम्राज्यावरील भारतीय संघाचा सूर्य कधी मावळणार नव्हता. १९२८ ते १९५२ या काळात भारतीय संघाने हॉकीवर अधिराज्य गाजविले. अर्थातच याचे सर्व श्रेय जाते ते मेजर ध्यानचंद, लेसली क्लाड्युअस, बलबीर सिंग सिनियर, अजितपाल सिंग, उधम सिंग, के. डी. सिंग बाबू, मोहम्मद शाहिद, शफर इक्बाल यांना. १९२८ ते १९५६ या काळात भारतीय हॉकी संघाने सलग ६ सुवर्णपदके जिंकली होती. त्यांनी सलग २४ सामने आपल्या नावावर केले होते. या काळात त्यांनी एकूण १७८ गोल केले होते. एक काळ असा होता, की महाराष्ट्राच्या धनराज पिल्लेचासुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळा दबदबा होता. १९७६ नंतर मात्र भारतीय हॉकी संघाला पदक जिंकता आले नाही. पुन्हा १९८० मध्ये मॉस्को येथे भारतीय हॉकी संघाने कमाल केली. या वेळी त्यांनी सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. नंतर १९८४, १९८८ व १९९२ आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना कोणताच चमत्कार करता आला नाही. यानंतर भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ संपत आल्यासारखे झाले होते. भारतामध्ये हॉकी मागे पडले आणि क्रिकेटने क्रीडाप्रेमींवर मोहिनी घातली. पण, आता थोडी परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय हॉकीने पुन्हा आपला दबदबा निर्माण केला आहे. रिओ येथे होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपली प्रवेशिका निश्चित केली आहे. संघामध्ये सरदारसिंग, एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, मनप्रीत सिंग, एस. के. उथप्पा, देविंदर वाल्मीकी आणि आपल्या संघाची चीनची भिंत असलेला गोलरक्षक पी. आर. श्रीजेश हे सर्वच खेळाडू चांगल्या बहरात आहेत. गेल्या काही महिन्यांत झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या या खेळाडूंनी जगाला दाखवून दिले आहे, की हम भी कुछ कम नहीं. त्यामुळे भारतीय संघाकडून या वर्षी पदकाची अपेक्षा करण्यात काहीच हरकत नाही. - शिवाजी गोरे>५ ते २१ आॅगस्ट २०१६भारतीय हॉकी संघाने १९२८ मध्ये अ‍ॅमस्टरडॅम येथे आपल्या देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्यानंतर १९३२ (लॉस एंजिलिस), १९३६ (बर्लिन), १९४८ (लंडन), १९५२ (हेलसिंकी) व १९५६ (मेलबर्न) हा पदकांचा सुवर्णकाळ होता. मेलबर्नमध्ये हॉकी संघाने सुवर्ण जिंकले, त्या वेळेस ध्यानचंद भारतीय संघात नव्हते. १९६० मध्ये रोम (इटली) येथे मात्र भारतीय हॉकी संघाने रौप्यपदक जिंकले. पुन्हा १९६४ मध्ये टोकिओ येथे भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदकावर कब्जा केला. १९६८ मध्ये मेक्सिको येथे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. १९७२ मध्ये म्युनिच येथेसुद्धा कांस्यपदकच पदरी पडले.