शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

खेळाडुंसाठी खुशखबर! 'खेलो इंडिया'तील विजेत्यांना मिळणार सरकारी नोकरी, सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 15:53 IST

देशातील लोकप्रिय 'खेलो इंडिया' खेळातील विजेत्यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Khelo India Games: देशभरातील विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी बुधवारी (दि.6) खेलो इंडिया गेम्सच्या (Khelo India Games) खेळाडूंना मोठी भेट दिली. आता खेलो इंडियाचे खेळाडू सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र असतील, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विटद्वारे दिली आहे. 

2018 मध्ये पहिल्यांदा खेलो इंडिया गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून या खेळांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. आता क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या खेळांच्या निकषांमध्ये मोठा बदल केला आहे. खेलो इंडिया गेम्समध्ये पदक जिंकणारे खेळाडू आता सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतील. यापूर्वी खेलो इंडिया गेम्सचे खेळाडू सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र नव्हते, पण सरकारने खेळाडूंना मोठी भेट दिली आहे. 

अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवर लिहिले की, मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारी नोकऱ्यांचे निकष बदलण्यात आले आहेत. या पाऊलामुळे आता खेलो इंडियाचे पदक विजेते खेळाडू सरकारी नोकऱ्यासांठी पात्र असतील. या सुधारित नियमांमुळे भारत क्रीडा महासत्ता बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकेल. 

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAnurag Thakurअनुराग ठाकुर