शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

ठरलं ! रविवारी भारत - पाकिस्तान भिडणार

By admin | Published: June 15, 2017 10:10 PM

भारतीयांसाठी 18 तारखेला येणारा रविवार हा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरणार आहे.

ऑनलाइन लोकमत

ओव्हल, दि. 15 -  भारतीयांसाठी 18 तारखेला येणारा रविवार हा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरणार आहे. भारतीय फलंदाजांचा एकंदरीत सुधारलेला फॉर्म पाहता अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील लढत रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारत आणि पाकिस्तान या अंतिम सामन्याच्या लढतीत दोन्ही संघ जबरदस्त खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिक खऱ्या अर्थाने रविवारची पर्वणी मिळणार आहे. 10 वर्षांनंतर ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्तानं भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. याआधी 2007ला झालेल्या ICC टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दोन्ही देश एकमेकांना भिडले होते. भारतीय संघ लागोपाठ दुस-यांदा ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. आता बांगलादेशलाही धडा शिकवल्यामुळे भारताच्या कामगिरीत चांगलीच सुधारणा झाली आहे. भारतीय फलंदाज फॉर्मात असून गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत, त्याप्रमाणेच क्षेत्ररक्षणही सुधारले आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली रविवारी भारत नक्कीच विजय खेचून आणेल, अशीच विराटच्या चाहत्यांना आशा आहे. युवराज सिंग कारकिर्दीतील 300वा सामना खेळून खिशात घातला आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या चांगले गोलंदाज भारताजवळ असल्यानं भारताची बाजू मजबूत आहे. कागदावर भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र तरीही भारतीय संघ या शेजारी देशाच्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. जर भारतानं विजय मिळवला तर क्रिकेट इतिहासात या विजयाची सर्वात मोठ्या विजयांमध्ये नोंद होईल.