शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

हार्दिकचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट’

By admin | Published: July 06, 2017 1:42 AM

चौथ्या वन डेत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आज गुरुवारी खेळला जाणारा पाचवा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण बनला आहे.

- सौरव गांगुली चौथ्या वन डेत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आज गुरुवारी खेळला जाणारा पाचवा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण बनला आहे. पाहुणा संघ १९० धावांचे सहज लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. या पराभवास जबाबदार खेळाडूृंना धारेवर धरले गेले. कुमकुवत विंडीजविरुद्ध सामना गमविल्यामुळे टीका होणे स्वाभाविक आहे. अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर हे लक्ष्य लहान वाटत असले तरी अवघड होते. प्रामाणिकपणे बोलायचे तर हे लक्ष्य मुळीच सोपे नव्हते. विकेटवर पाय रोवणे आणि नंतर लक्ष्य गाठणे असे विजयाचे समीकरण होते. हे काम पूर्ण करण्यासाठी अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंग धोनी हे दोन फलंदाज होते. दोघेही खेळपट्टीवर स्थिरावले पण विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. धोनीने चांगली सुरुवात केली पण लक्ष्य भेदण्यात तो देखील अपयशीच ठरला. वन डे क्रिकेटमध्ये धोनीचे तंत्र वेगळेच आहे. अनेकदा तो आपल्या तंत्रात यशस्वी ठरला पण या सामन्यात तो स्वत:च्या चक्रव्यूहात अडकला असावा. अशा परिस्थितीत यश आणि अपयशामध्ये पुसटशी रेषा असते. धोनीला स्वत:चा प्रयत्न यशस्वी करता आला नाही. माझ्यामते हार्दिक पांड्याचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट ’ ठरला. तो चांगला फलंदाज आहे शिवाय धोनीच्या सोबतीने दडपण झुगारण्यात पटाईत मानला जातो. त्यानंतर रवींद्र जडेजा हा देखील धोनीची साथ देण्यात अपयशी ठरला. या पराभवामुळे कितीही टीका झाली झाली तरी अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग खरोखर कठीण होता, हे मान्य करावे लागेल. या खेळपट्टीवर चेंडू जुना झाला की अधिक धोकादायक ठरतो. चेंडू कधी उसळी घेईल, याचा वेध घेणे कठीण होते शिवाय वेगवान आॅफ ब्रेक मारा खेळणे अधिक कठीण होऊन बसते. धोनी लवकर बाद झाला असता तर सामना देखील फार आधी संपला असता.भारताला अखेरचा वन डे जमैकाच्या मैदानावर खेळायचा आहे. येथील खेळपट्टी अँटिग्वाच्या तुलनेत चांगली आहे. हा सामना भारताने जिंकायलाच हवा. भारतीय संघात काही बदल होऊ शकतील. पण जे बदल होतील त्या स्थितीतही विंडीजवर विजय नोंदवायलाच हवा. (गेमप्लान)