शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

हार्दिक ठरतोय गेम चेंजर

By admin | Published: February 26, 2016 4:05 AM

पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटके मारण्याची क्षमता असलेल्या हार्दिक पंड्या याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीला प्रभावित केले आहे. या युवा खेळाडूची धोनीने स्तुती

मिरपूर : पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटके मारण्याची क्षमता असलेल्या हार्दिक पंड्या याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीला प्रभावित केले आहे. या युवा खेळाडूची धोनीने स्तुती केली आहे. तो म्हणाला, की टी-२० मध्ये भारतासाठी हार्दिक गेम चेंजर ठरला आहे. पंड्याने १८ चेंडूंतच ३१ धावा केल्या होत्या. आणि २३ धावा देत १ बळीही मिळवला. भारताने आशिया कपमध्ये पहिल्या सामन्यात बांगलादेशला ४५ धावांनी मात दिली. धोनी म्हणाला की, त्याला चार षटके टाकताना पाहून आनंद वाटला. त्यामुळे संघाची ताकद वाढली आहे. संघात बदल करण्याची गरज पडणार नाही. या संघात सात फलंदाज ठेवण्याची गरज काय, असा प्रश्नही उपस्थित होत होता. मात्र, हार्दिकसारखे खेळाडू संघात असतील तर ७ फलंदाज ठेवले जाऊ शकतात.’’ (वृत्तसंस्था)नेहराची शिस्त, युवराजच्या दृष्टिकोनाचे कौतुक आम्हाला हार्दिकला फार काही सांगण्याची गरज पडत नाही. त्याला फक्त चेंडू सीमारेषेबाहेर फेकणे माहीत आहे आणि तो तेच करतो. तो चौकार आणि षटकार जास्त लावतो. तो जितके जास्त सामने खेळेल तितकी त्याची कारकीर्द बहरत जाईल. पंड्याच्या समावेशामुळे संघ संतुलित झाला आहे. या प्रकारात ते खेळाडू जास्त चांगले योगदान देऊ शकतात, जे फलंदाजी आणि गोलंदाजीतही उत्तम योगदान देतात. युवा खेळाडूंच्या संघात ३६ वर्षांचा आशिष नेहरा आणि ३४ वर्षांचा युवराज सिंग आहे. या दोघांचा संघात समावेश होईल, असे फारसे कुणालाही वाटले नसेल. मात्र, नेहराची शिस्तप्रियता आणि युवराजचा दृष्टिकोन यांचे धोनीने कौतुक केले आहे. हे दोन्ही खेळाडू धोनीच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग ठरले. युवराजने पहिल्या सामन्यात १५ धावा केल्या. त्याबाबत बोलताना धोनी म्हणाला की, त्याचा दृष्टिकोन योग्य होता. अचानक जाऊन तुम्ही ते सर्व करू शकत नाही, जे तुम्ही ठरवलेले आहे. मोर्तुजाने केला शाकिबचा बचावबांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तुजा याने शाकिब अल हसनचा बचाव केला आहे. पहिल्या सामन्यात शाकिबने रोहित शर्माचा सोपा झेल सोडला होता. त्या वेळी रोहित शर्मा २१ धावांवर खेळत होता. त्यानंतर रोहितने ८३ धावा केल्या आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला. मोर्तुजा म्हणाला की, ‘‘रोहितचा झेल सामन्यातील टर्निंग पॉइंट होता. मात्र झेल हा सुटू शकतो. शाकिब बांगलादेशच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.’’डावाची सुरुवात करणे अतिरिक्त जबाबदारीसर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्मा याने म्हटले की, डावाची सुरुवात करणे ही अतिरिक्त जबाबदारी आहे. अग्रक्रमात फलंदाजी करताना माझ्यावर अतिरिक्त जबाबदारी येते. माझी ही जबाबदारी आहे की चांगला स्कोर बनवावा आणि सामना जिंकण्याची सवय लावावी. क्रिकेटमध्ये अनुभव महत्त्वाचा ठरतो. अनुभवामुळेच संघाचा डाव कसा सावरावा, दबावातही कसे खेळावे हे कळते.’’