शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

मी नेहमीच ड्रेसिंग रुममधील पावित्र्य राखलं, विराट कोहलीचा कुंबळेवर निशाणा

By admin | Published: June 23, 2017 3:19 PM

मी कधीच ड्रेसिंग रुममध्ये काय घडले, याचा खुलासा करणार नाही, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले

ऑनलाइन लोकमत
पोर्ट ऑफ स्पे, दि. 23 - "अनिल भाईंनी आपलं मत व्यक्त केलं असून त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचा मी आदर करतो", असं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बोलला आहे. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच विराट कोहलीने यावर भाष्य केले. अनिल कुंबळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याचं कारण सांगितलं होतं. त्यानंतर विराट कोहलीवर सर्व स्तरातून टीका होऊ लागली होती. मात्र अद्यापपर्यंत विराट कोहलीने यावर भाष्य केले नव्हते. 
 
(ड्रेसिंग रूममधील बाबी उघड करणार नाही : कोहली)
(जंबोचा कोहलीवर विराट आरोप)
 
(सहा महिन्यांपासून संवाद नव्हता)
(विराटने ऐनवेळी घेतला होता फिल्डिंगचा निर्णय)
 
"चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धा पार पडल्यानंतर लगेचच हे सर्व घडलं. चॅम्पिअन्स ट्रॉफीदरम्यान माझ्या एकूण 11 पत्रकार परिषद झाल्या. चेंजिंग रुममध्ये जे काही होतं त्याचं पावित्र्य राखण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षात आम्ही एक कल्चर निर्माण केलं आहे. सर्व संघाचा यावर विश्वास असून आमच्यासाठी ते सर्वश्रेष्ठ आहे. मी नेहमी याचा आदर केला असून सातत्य राखण्याचा प्रयत्न करत आहोत", असं विराट कोहलीने सांगितलं आहे.
 
(प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा बीसीसीआयचा निर्णय)
 
"मी एक क्रिकेटर म्हणून नेहमीच त्यांचा आदर करतो. त्यांनी देशासाठी जे केलं आहे, जे मिळवलं आहे ते त्यांच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही", असंही विराटने यावेळी सांगितलं. 
 
अनिल कुंबळे यांच्यासोबतच्या वादावर सविस्तर चर्चा करण्यापेक्षा सध्या आपलं संपुर्ण लक्ष वेस्ट इंडिज दौ-यावर देणार असल्याचंही विराटने यावेळी स्पष्ट केलं आहे. राजीनामा देणारे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी कर्णधारासोबतचे संबंध अस्थिर झाल्याचे वक्तव्य केले आहे. त्याबाबत बोलताना कोहलीने वरील वक्तव्य केले.
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाचं मनौधेर्य खचलं असताना अनिल कुंबळेने संघाला पाठिंबा देण्याऐवजी चांगलंच झाडलं. आधीच पराभवामुळे खच्ची झालेल्या संघाला प्रशिक्षक आपल्याला खेळाडूप्रमाणे न वागवता, लहान मुलांप्रमाणे वागवत असल्याचं वाटत होतं. ज्याप्रकारे अनिल कुंबळे यांनी खेळाडूंशी संवाद साधला, त्यावरुन विराट कोहली नाराज झाला होता. 
 
भारतीय संघाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप अनिल कुंबळेने पायउतार होताना केला आहे. फेसबूक आणि ट्विटरवर एक पोस्ट करत जंबोने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
 
 आपल्या पोस्टमध्ये जंबो म्हणतो, गेले वर्षभर मी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी होण्याचं श्रेय कर्णधार, संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफला देतो. माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर आणि मी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्यावर कर्णधाराचा आक्षेप असल्याचं काल पहिल्यांदाच मला बीसीसीआयकडून समजलं. मी कायमच कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या सीमा ओळखून काम करत असल्याने मला धक्का बसला आहे.
 
 कुंबळेंनी पुढे म्हटले, बीसीसीआयने आमच्यातील मतभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र मला असं वाटतं की आता हे पद सोडण्याची वेळ आली आहे. प्रशिक्षकपदाची धुरा बीसीसीआय ज्या व्यक्तीला पात्र समजेल, त्याच्याकडे सुपूर्द करण्याची मी विनंती करतो.
 
 दोघांमध्ये अनेक गोष्टींवरुन वाद सुरु होते. विशेष म्हणजे दोघांमध्येही गेल्या सहा महिन्यांपासून अबोला होता. कोहली आणि कुंबळेनं गेल्या वर्षी डिसेंबर 2016मध्ये इंग्लंड टेस्ट सीरिज संपल्यानंतर एकमेकांशी बोलणं थांबवलं होतं. दोघांमध्ये वाद होता ते माहीत होतं. मात्र ते 6 महिने एकमेकांशी बोलत नसल्यानं आम्हीसुद्धा अचंबित झालो, असंही बीसीसीआयच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर दोघांमध्ये एक बैठक झाली आणि एकमेकांसोबत काम करण्यास इच्छुक नसल्याचं दोघांनाही समजलं. अनिल कुंबळेला वादामागील कारण विचारण्यात आलं तेव्हा त्यानं विराटची कोणतीही समस्या नाही. पण माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर कोहलीला आक्षेप असल्याचं कुंबळेनं सांगितलं, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच विराटला वाटायचं की, स्वतः क्षेत्रातही अनिल कुंबळे हस्तक्षेप करतोय. कुंबळे स्वतःचा सल्ला नेहमीच कोहलीला देत होता. मात्र कोहलीला त्याचा तो सल्ला स्वतःच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्यासारखा वाटायचा, असंही बीसीसीआयच्या अधिका-यानं सांगितलं आहे.