शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : श्रीलंकेला गृहीत धरणे नडले

By admin | Published: June 09, 2017 3:43 PM

440 व्होल्टचा करंट लागणे म्हणजे नेमके काय, याचा प्रत्यय भारतीय क्रिकेटप्रेमींना काल ओव्हलवर आला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीलाच पाकिस्तानला गारद केल्यावर

- बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
 
440 व्होल्टचा करंट लागणे म्हणजे नेमके काय, याचा प्रत्यय भारतीय क्रिकेटप्रेमींना काल ओव्हलवर आला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीलाच पाकिस्तानला गारद केल्यावर थेट 18 तारखेच्या अंतिम लढतीच्या स्वप्नात हरवलेला भारतीय संघ आणि त्याच्या पाठिराख्यांना मॅथ्युज आणि टीमने जबरदस्त शॉक दिला. त्याची तीव्रता एवढी होती की ओव्हलपासून थेट भारतात घरात बसून सामना पाहत असलेल्या प्रत्येकालाच काही काळ बधीर झाल्यासारखे वाटले.
खरंतर परंपरेप्रमाणे पाकिस्तानला चोपल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध आपला विजय आपण गृहीत धरला. पण हीच बाब आपल्याला नडली. श्रीलंकेचा संघ बऱ्यापैकी नवखा असला तरी तो दुबळा नाही, याचे भान ठेवले पाहिजे होते. पण तसे झाले नाही. श्रीलंकेसाठी किती धावा पुरेशा ठरतील, याबाबतही भारतीय संघव्यवस्थापन गोंळल्यासारखे वाटले. रोहित शर्मा आणि शिखर धवनची सलग दुसऱ्या सामन्यातील दमदार सलामी आणि अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर आपण तीनशे पार मजल मारली. पण धावफलकावर सव्वातीनशेच्या आसपास धावा लागल्यावर भारतीय संघ काहीसा निश्चिंत झाला. श्रीलंका या आव्हानाच्या आसपासही पोहोचू शकत नाही, असा त्यांचा समज झाला.
श्रीलंकन फलंदाजीचा एकंदरीत वकूब पाहता त्यात काही गैर नव्हते. पण मैदानात घडले ते भलतेच. कडकडीत ऊन पडल्याने खेळपट्टीकडून मदत मिळेनाशी झाली. चेंडू सरळ  बॅटवर येऊ लागल्याने भारताचा मध्यमगती मारा निष्प्रभ ठरला. तर फिरकीची मदार असलेल्या सर जडेजानेही हात टेकले.
अशा अनुकूल परिस्थितीत श्रीलंकेच्या गुणतिलका, मेंडिस, परेरा, गुणरत्ने आदी रत्नांनी भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा उघड करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे विकेट घेणे दुरची बात साध्या धावा रोखणेही आपल्याला शक्य झाले नाही. अखेर कुठल्याशा बनियनच्या जाहिरातीत सैफ अली खान धावण्याची शर्यत "बडे आरामसे" पूर्ण करतो, तसे श्रीलंकन संघाने 322 धावांचे लक्ष्य अगदी आरामात गाठले.
आता ब गटात चारही संघांचे प्रत्येकी दोन गुण झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे या गटातील पुढच्या दोन लढती जो जिता वही सिकंदर ठरणार आहेत. त्यात रविवारी होणाऱ्या लढतीत विराट कोहलीच्या भारतीय संघाला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.