शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

परदेशातील आयपीएलचा विचार सुरू

By admin | Published: April 23, 2016 4:09 AM

राज्यावर दृष्काळाचे सावट आयपीएल पूर्वीचे आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टी२० वर्ल्डकपचे ४ सामने महाराष्ट्रात झाले. तेव्हा आक्षेप झाला नाही

पुणे : राज्यावर दृष्काळाचे सावट आयपीएल पूर्वीचे आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टी२० वर्ल्डकपचे ४ सामने महाराष्ट्रात झाले. तेव्हा आक्षेप झाला नाही. मात्र, आयपीएल सुरू होताच; खेळाडूंना खेळू देणार नाही, पाणी देणार नाही असे अडथळे निर्माण होत असतील तर पुढील वर्षी आयपीएल देशाबाहेर हालविण्याबाबत विचार करावा लागणार असे आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला शुक्रवारी पुण्यात म्हणाले.शुक्ला म्हणाले ,‘‘ गेल्या काही वर्षात आयपीएल हा जगप्रसिध्द ब्रँन्ड बनला असून जगभरातील सर्वच देशात सामने पाहिले जातात. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही गोष्टींना विरोध केला जात नाही. स्पर्धा सुरू होताच विविध कारणे शोधून स्पर्धेला अडथळा निर्माण केला जातो. एखादा ब्रँड निर्माण करण्यास वेळ लागतो. मात्र, तो पाडण्यास काहीच वेळ लागत नाही. त्यामुळे आयपीएलबाबत सुरू असलेल्या विरोधाच्या घटना पाहता या वर्षीच्या स्पर्धाच्या पुढील नियोजनावर आमचे लक्ष आहे.’’ तसेच, ‘‘राज्यातील दुष्काळाबाबत आपण संवेदनशिल असून दुष्काळ निवारणासाठी दिर्घकालीन उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यशासनास सहकार्य करण्याची आमची तयारी असून पाणी न वापरणे अथवा स्पर्धा राज्याबाहेर हलविणे हे दुष्काळावर उपाय होणार नाहीत. ही बाब लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जावा,’’ अशी अपेक्षा शुक्ला यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आयपीएलचे राज्याबाहेर हालविण्यात आल्याने मुंबई व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला फटका बसला आहे. मुंंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा त्यांना अधिकार असल्याचेही शुक्ला म्हणाले.