शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: भारत-जपान पुन्हा भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 07:44 IST

भारताचा भक्कम बचाव भेदण्यासाठी आणि आक्रमक फळीला  थोपविण्यासाठी जपानला चांगलेच झुंजावे लागेल.

ढाका : गतविजेत्या भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी पुन्हा एकदा जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. याआधी अखेरच्या साखळी सामन्यात भारताने जपानचा ६-० असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ मानसिकरित्या एक पाऊल पुढे असेल. भारताचा भक्कम बचाव भेदण्यासाठी आणि आक्रमक फळीला  थोपविण्यासाठी जपानला चांगलेच झुंजावे लागेल.

अखेरच्या साखळी सामन्यात जपानला मोठ्या अंतराने नमवले असले, तरी भारतीयांना सजग राहावे लागेल. पाच देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ १० गुणांसह अव्वल स्थानी असून, कोरिया दुसऱ्या स्थानी आहे. जपान आणि पाकिस्तान प्रत्येकी ५ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत. यजमान बांगलादेश अखेरच्या स्थानी असून, त्यांना गुणांचे खाते उघडता आले नाही. 

उपकर्णधार हरमनप्रीत सिंग शानदार लयीमध्ये असून, मध्यरक्षक मनप्रीत आणि हार्दिक सिंग यांनीही चांगला खेळ केला आहे. याशिवाय दिलप्रीत सिंग, जरमनप्रीत सिंग, आकाशदीप सिंग आणि शमशेर सिंग यांचे आक्रमण रोखणे जपानला सोपे जाणार नाही.

टॅग्स :Hockeyहॉकी