शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

भारत ‘ब’चा भारत ‘अ’वर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2016 2:39 AM

कर्णधार उन्मुक्त चंदने केलेल्या नाबाद ७७ धावांच्या जोरावर भारत ब संघाने देवधर चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघाला पाच गडी राखून हरविले.

कानपूर : कर्णधार उन्मुक्त चंदने केलेल्या नाबाद ७७ धावांच्या जोरावर भारत ब संघाने देवधर चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघाला पाच गडी राखून हरविले. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या भारत अ संघाने ४४.२ षटकांत १६१ धावांवर नांगी टाकली. या संघाची धावसंख्या एकवेळेस ५ बाद २९ अशी होती. त्यानंतर अष्टपैलू परवेझ रसूल (६६) आणि कर्णधार अंबाती रायुडू (५८) यांनी सहाव्या गड्यासाठी १०४ धावांची भागीदारी केल्यामुळे संघाला थोडीफार सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.याच्या प्रत्युत्तरात उन्मुक्त चंदने केलेल्या नाबाद ७७ धावांमुळे भारत ब संघाने २९.२ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. चंदने ८२ चेंडू खेळताना ९ चौकार आणि एक षटकार ठोकला. उन्मुक्त चंदने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा पर्याय निवडल्यानंतर त्याच्या गोलंदाजांनी ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर आपले काम चोखपणे पार पाडले. धवल कुलकर्णी (९ धावांत २ बळी) आणि नत्थूसिंग (२३ धावांत ३ बळी) यांनी आघाडीचा फडशा पाडला. कसोटीपटू मुरली विजयला २२ चेंडू खेळूनही आपले खाते उघडता आले नाही. (वृत्तसंस्था)