शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

भारताची ऑस्ट्रेलियावर ३७ धावांनी मात

By admin | Published: January 26, 2016 5:33 PM

एकदिवसीय सामन्यांची मालिका ४ - १ अशी दयनीयरीत्या हरणा-या भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी - २० सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे

ऑनलाइन लोकमत
अॅडलेड, दि. २६ - एकदिवसीय सामन्यांची मालिका ४ - १ अशी दयनीयरीत्या हरणा-या भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी - २० सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा व सुरेश रैना यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने २० षटकांमध्ये १८८ धावा केल्या व ऑस्ट्रेलियाला १८९ धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाचा धाव १९.३ षटकांमध्ये १५१ धावांमध्ये गुंडाळत भारताने ३७ धावांनी विजय मिळवला आहे.
परंतु, अरॉन फिंच वगळता ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज टिकला नाही. फिंचने ३३ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. अश्विनने ४ षटकांमध्ये २८ धावा देत २ गडी बाद केले. जाडेजाने ४ षटकांमध्ये २१ धावा देत २ गडी बाद केले. हार्दिक पंड्या व बुमराहनेही प्रत्येकी २ गडी टिपले. आशिष नेहराने एक गडी बाद केला.
त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये पहिली फलंदाजी करणा-या भारताने चांगली फटकेबाजी करत २० षटकांमध्ये ३ गडी गमावत १८८ धावा केल्या.
या सामन्यात युवराज सिंगचे पुनरागमन झाले असले तरी वरच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे युवराजला फलंदाजीची संधी मिळाली नाही. विराट कोहलीने अवघ्या ५५ चेंडूंमध्ये ९० धावा फटकावल्या. तर रोहित शर्माने २० चेंडूंमध्ये ३१ धावा व सुरेश रैनाने ३४ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या.
शेवटच्या षटकात दुस-या चेंडूवर रैना बाद झाल्यावक आलेल्या महेंद्रसिंह धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार व दुस-या चेंडूवर चौकार लगावला. धोनीने ३ चेंडूंमध्ये ११ धावांची उपयुक्त खेळी केली.
तीन टी - २० सामन्यांची ही मालिका असून भारताने १ - ० अशी आघाडी घेतली आहे.