शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

भारत जेतेपद कायम राखू शकतो

By admin | Published: May 31, 2017 12:50 AM

गतचॅम्पियन भारतीय संघात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे. भारतीय संघ समतोल असून वेगवान

लंडन : गतचॅम्पियन भारतीय संघात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे. भारतीय संघ समतोल असून वेगवान गोलंदाजी धारदार आहे, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केली. संगकाराने स्तंभात म्हटले आहे, ‘यंदा या स्पर्धेत आशियातील चार संघ खेळत असून भारत या विभागात सर्वांत आघाडीवर आहे. भारताने २०१३ मध्ये जेतेपद पटकावले होते आणि यंदाही या संघात जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे.’ संगकाराने म्हटले, ‘भारतीय संघ संतुलित व मजबूत  आहे. वेगवान गोलंदाजी धारदार  आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन  व रवींद्र जडेजा वन-डे क्रिकेटमध्ये शानदार आहेत. विराट कोहली आयपीएलमधील निराशाजनक कामगिरी पिछाडीवर सोडत या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल, असा मला विश्वास आहे.’ भारतीय संघातील फलंदाजांच्या निवडीबाबत बोलताना संगकारा म्हणाला, ‘भारताने फलंदाजांची निवड करताना परंपरागतपणा जपला  आहे, पण तरी त्यांची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.’ संगकाराने सांगितले, ‘अंतिम फेरीसाठी संघांची निवड करणे  कठीण आहे, पण माझ्या मते उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या संघांमध्ये आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.’ २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१४ मध्ये विश्व टी-२० स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या श्रीलंका संघात संगकाराचा समावेश होता. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या संगकाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण २८,०१६ आंतरराष्ट्रीय धावा फटकावल्या आहेत. (वृत्तसंस्था)स्पर्धा चुरशीची होईल. चार-पाच संघ अंतिम फेरी गाठण्यास सक्षम आहेत. केवळ एक-दोन संघच वर्चस्व गाजवित असल्याचे दिवस आता संपले आहेत. अनेक देशांमध्ये क्रिकेटचा विकास झाला आहे. या सर्व संघांमध्ये प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे. इंग्लंडच्या वन-डे संघाने गेल्या दोन वर्षांत चांगली प्रगती केली आहे. इंग्लंड संघ आक्रमक खेळत असून या संघात काही विश्वदर्जाचे  खेळाडू आहेत.- कुमार संगकारा