शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

भारताने फलंदाजीमध्ये कमी प्रयोग केले

By admin | Published: July 08, 2017 1:20 AM

अखेर भारताने ३-१ अशा मोठ्या फरकाने विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली; पण एकवेळ असेही वाटत होते की, जर वेस्ट इंडिज अखेरचा सामना

- अयाझ मेमन संपादकीय सल्लागार अखेर भारताने ३-१ अशा मोठ्या फरकाने विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली; पण एकवेळ असेही वाटत होते की, जर वेस्ट इंडिज अखेरचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरले, तर भारतासाठी हा मोठा धक्का बसला असता. कारण भारत तिसऱ्या क्रमांकाचा संघ असून, विंडीज नवव्या स्थानी आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सर्व अनपेक्षित ठरले असते. पाचवा सामना जिंकण्यात अपयश आले असते, तर भारताच्या प्रतिष्ठेला आणि खेळाडूंच्या आत्मविश्वासालाही नक्कीच मोठा झटका बसला असता. त्यामुळेच हा सामना खूप महत्त्वाचा होता. खास करून विराट कोहलीसाठी हा सामना महत्त्वाचा होता. केवळ फलंदाज म्हणून नाही, तर कर्णधार म्हणून जर का ही मलिका बरोबरीत सुटली असती, तर त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले असते. ज्याप्रकारे त्याच्यात आणि प्रशिक्षकामध्ये वाद झाला, ते पाहता त्याच्यावर स्वत:ला सिद्ध करण्याचा दबाव होता आणि त्याने ते केले. कोहलीने एक शतक ठोकले. त्याचे हे २८ वे शतक ठरले. ही जबरदस्त कामगिरी आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याने कर्णधार म्हणून जिंकण्याची जी जबाबदारी घेतली होती, त्यात तो यशस्वी ठरला. अखेरपर्यंत टिकून राहताना त्याने संघाला विजयी मार्गावर नेले. केवळ स्वत:साठी न खेळता संघाला विजयापर्यंत नेणे, ही महान खेळाडूची एक ओळख असते. कोहलीला या सामन्यात दिनेश कार्तिकने चांगल्या प्रकारे साथ दिली. विशेष म्हणजे, खेळाडूंच्या बदलाविषयी केलेले प्रयोग विशेष वाटले नाहीत. युवराज जखमी होता. त्याच्या जागी आलेल्या कार्तिकविषयी जास्त काही सांगायची आवश्यकता नाही. तो दहा वर्षांपासून खेळत आहे. इथे त्याला चांगली संधी मिळाली. तसेच रिषभ पंतला आजमवायला पाहिजे होते. आगामी विश्वचषकच्यादृष्टीने त्याची तयारी पाहता आली असती. त्यामुळे ही एक संधी भारताने गमावली असल्याचे मला वाटते. मालिकेत संघात फारसे बदल करण्यात आले नाहीत. सातत्यपूर्ण कामगिरी मान्य आहे; पण प्रयोग करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गोलंदाजीत चांगल्या प्रकारे प्रयोग करण्यात आले. मोहम्मद शमीने पुनरागमन करीत चार बळी घेतले. त्याच्या व्यतिरिक्त उमेश यादवने चांगली गोलंदाजी केली. कुलदीप यादवने वेगळी छाप पाडली. गोलंदाजीमध्ये प्रत्येकाने छाप पाडली. वेगवान गोलंदाज वेगवान गोलंदाजांवर, तर फिरकी गोलंदाज फिरकी गोलंदाजांवर दडपण टाकीत होते. असाच प्रकार फलंदाजीमध्येही व्हायला पाहिजे होता. संघातील जागा कोणीही गृहित धरू शकत नाही आणि हाच दृष्टिकोन असायला हवा, हे माझे मत आहे. यामुळे संघात स्थिरावलेल्या खेळाडूंवरही सातत्यपूर्ण कामगिरीचे दडपण राहील. आता बघूया टी-२० सामन्यात काय होतंय ते.