शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

भारतच आशियाचा शेर, विजेतेपदाचे ‘विराट-शिखर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2016 3:19 AM

. हायहोल्टेज स्वरूप प्राप्त झालेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशवर ८ गडी आणि ७ चेंडू राखून मात केली. या विजयानंतर भारताने आशिया चषक टी-२० चषकावर नाव कोरले.

मिरपूर : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशवर ८ गडी राखून मात करत आपणच आशियाचा शेर असल्याची डरकाळी भारताने फोडली. विराट कोहलीची संयमी खेळी आणि शिखर धवनचे दमदार अर्धशतक आणि त्यानंतर आलेल्या धोनीने सहा चेंडूत तडकावलेल्या २० धावांच्या जोरावर भारताने सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. पावसाच्या व्यत्ययानंतर पंधरा षटकांच्या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बांगलाच्या साबिर रेहमान आणि मेहमुद्दला यांनी केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर संघाला १५ षटकात ५ बाद १२० धांवाचा डोंगर उभा करून दिला. मात्र हे आव्हान  भारताने लिलया पेलले. ८ गड्यांनी हरवत भारताने बांगलादेशला त्यांच्याच भूमित नमविले.  

गोलंदाजांच्या ‘कमाल’ कामगिरीनंतर फॉर्मशी झगडणाऱ्या शिखर धवनच्या ‘धमाल’ अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने शेर-ए- बांगलावर ‘शेरदिल’ विजय नोंदवला. हायहोल्टेज स्वरूप प्राप्त झालेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशवर ८ गडी आणि ७ चेंडू राखून मात केली. या विजयानंतर भारताने आशिया चषक टी-२० चषकावर नाव कोरले. उल्लेखनीय म्हणजे, स्पर्धेत भारताने अपराजीत कामगिरी केली. बांगलादेशचे ५ बाद १२० धावांचे आव्हान भारतीय संघाने १३.५ षटकांत गाठले. शिखर धवनने ४४ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६० धावांची खेळी केली. त्याला विराट कोहलीने उत्कृष्ट साथ दिली. विराट ४१ धावांवर नाबाद राहिला. धवन परतल्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार धोनीने दणादण षटकार ठोकले. षटकार ठोकूनच त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनीने ६ चेंडूंत २० धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात सलामीवीर रोहित शर्मा (१) बाद झाला. त्यानंतर मात्र शिखर धवन (६०) आणि विराट कोहली (नाबाद ४१) या जोडीने चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताचा पाया रचला गेला. त्यावर धोनीने ‘विजयी’ कळस चढवला. बांगलादेशकडून अल-अमिन हसन आणि तस्कीन अहमदने प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधी, अष्टपैलू मेहमुदुल्लाने केलेल्या तडाखेबंद नाबाद ३२ धावांच्या बळावर बांगलादेशने भारतापुढे ५ बाद १२० धावांचे लक्ष्य उभारले होते. या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे उशिरा सुरू झालेला हा सामना प्रत्येकी १५ षटकांचा खेळविण्यात आला. मेहमुदुल्लासोबत शब्बीर रहमान याने नाबाद ३२ धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ४५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे बांगलादेशला शतकी धावसंख्या गाठता आली. त्याआधी, भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने १२ षटकांत ७५ धावांत ५ फलंदाज गमावले होते. अशा स्थितीतून सावरत बांगलादेशने शतकी मजल मारली. त्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला तो मेहमुदुल्ला याने. त्याने शानदार फटकेबाजी करीत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत आणले. अवघ्या १३ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकार खेचत त्याने या ३३ धावा फटकावल्या. त्याने १३ व्या षटकात आशिष नेहराच्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर १४ व्या षटकात हार्दिक पंड्याला चौकार आणि दोन षटकार लगावत एकूण २१ धावा कुटल्या. तमीम इक्बालने १३, तर सौम्या सरकारने १४ धावा केल्या. भारताकडून आश्विन, नेहरा, बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पंड्याला मात्र बळी मिळवता आला नाही.> भारतीय संघाने विक्रमी सहाव्यांदा आशियाई चषक विजेतेपद जिंकले ज्याचे पहिल्यांदाच टी-२० प्रारुपमध्ये आयोजन केले होते. आधीचे पाचही विजेतेपद ५० षटकांच्या स्पर्धंेमध्ये होते. > इतर पुरस्कारकुलेस्ट प्लेयर - विराट कोहलीसामनावीर - शिखर धवनमालिकावीर - शब्बीर रेहमानधावफलक : बांगलादेश : १५ षटकांत ५ बाद १२० धावा : फलंदाजी : तामीम इक्बाल पायचीत गो. बुमराह १३, सौम्या सरकार झे. पंड्या गो. नेहरा १४, शब्बीर रहमान नाबाद ३२, शाकिब अल हसन झे. बुमराह गो. आश्विन २१, मुशफिकीर रहीम धावबाद ४, मशर्रफे मुर्तझा झे. कोहली गो. जडेजा ०, मेहमुदुल्ला नाबाद ३३. अवांतर ३. गोलंदाजी : आश्विन ३-०-१४-१, नेहरा ३-०-३३-१, बुमराह ३-०-१३-१, जडेजा ३-०-२५-१, पंड्या ३-०-३५-०. भारत : १३.५ षटकांत २ बाद १२२. फलंदाजी : रोहित शर्मा झे. सौम्या सरकार गो. अल हसन १, धवन झे. सौम्या सरकार गो. तस्कीन अहमद ६०, विराट कोहली नाबाद ४०, महेंद्रसिंह धोनी नाबाद २०. अवांतर -०. गोलंदाजी : तस्कीन अहमद ३-०-१४-१, अल हसन ३-०-१३-१, अबू हिडर १-०-१४-०, शाकिब अल हसन २-०-२६-०, मुर्तझा २-०-१६-०, नासीर हुसेन ३-०-२२-०.

(वृत्तसंस्था)