शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

भारताने लुटले विजयाचे सोने...

By admin | Published: October 12, 2016 7:05 AM

अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर यजमान आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय

अहमदाबाद : अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर यजमान आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवताना बांगलादेशला ५७-२० असे लोळवले. या धमाकेदार विजयासह यजमानांनी ‘अ’ गटामध्ये ११ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.पहिला गुण बांगलादेशने जिंकल्यानंतर संपूर्ण सामन्यात भारताचा अपेक्षित दबदबा राहिला. भारतीयांनी केलेल्या जबरदस्त आक्रमणापुढे बांगलादेशचा शेवटपर्यंत निभाव लागला नाही. तब्बल ४ वेळा लोण चढवून भारतीयांनी बांगलादेशच्या आव्हानातली हवा काढली. मध्यंतरालाच भारताने २७-१० अशी १७ गुणांची एकतर्फी आघाडी सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर बांगलादेशला केवळ १० गुण मिळवता आले. तर, भारतीयांनी बांगला खेळाडूंना कबड्डीचे धडे देताना सहज बाजी मारली. गेल्या दोन सामन्यांत लौकिकानुसार खेळण्यात अपयशी ठरलेल्या अजय ठाकूरने या सामन्यात आपल जलवा दाखवताना सर्वाधिक ११ गुणांची वसुली केली. तर, प्रदीप नरवालनेदेखील खोलवर चढाया करताना ८ गुण कमावले. तसेच, सुरेंद्र नाडा आणि संदीप नरवाल यांच्या भक्कम पकडीमध्ये बांगलाचे चढाईपटू अडकत गेले. बांगलादेशकडून कर्णधार अरुदुझमन मुन्शी याने एकाकी झुंज देताना आक्रमणात ६ गुणांची कमाई केली. तर, फेरदुस शेखने ४ गुण मिळवताना चांगल्या पकडी केल्या. (वृत्तसंस्था)