शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत केवळ कोहलीवर विसंबून नाही : कपिल

By admin | Published: May 11, 2017 8:32 PM

विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरू नये. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान संघाचे यश केवळ त्याच्यावरच विसंबून नसल्यामुळे ही बाब निरर्थक ठरत

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 : विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरू नये. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान संघाचे यश केवळ त्याच्यावरच विसंबून नसल्यामुळे ही बाब निरर्थक ठरत असल्याचे मत विश्वविजेता संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनीव्यक्त केले. चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात जूनच्या पहहिल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये होत असून, सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये कोहली चक्क फ्लॉप ठरला आहे. कोहलीच्या फॉर्ममुळे चॅॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान भारताच्या कामगिरीवरविपरीत परिणाम होईल का, असा सवाल करताच कपिल म्हणाले,ह्यआपण धर्मशालामधील आॅस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना पाहिला का? कोहली खेळणार नसेल तर भारत पराभूत होईल, अशी भीती प्रत्येकाने व्यक्त केली होती. पण काय घडले, हेसर्वांना ठाऊक आहे. भारताचे भवितव्य केवळ कोहलीवर विसंबून आहे असे म्हणण्याचा अर्थ संघातील अन्य खेळाडूंचा आत्मविश्वास कमी करणे असा होतो.५८ वर्षांचे कपिल पुढे म्हणाले, कोहली संघाचा मोलाचा सदस्य आहे. दिग्गज फलंदाजदेखील आहे. कधी कसे खेळायचे याची त्याला चांगली जाणीव आहे. भारत ही स्पर्धा जिंकू शकतो; पण स्पर्धेदरम्यान डावपेच कसे कार्यान्वित होतात, यावर विजयाचे समीकरण ठरणार आहे. दिल्लीचा मॅडम तुसाद संग्रहालयात कपिल यांच्या मेणाच्या पुतळ्याचे त्यांच्याच हस्ते आज अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना कपिल म्हणाले, भारताने गेल्या पाच वर्षांत खेळाचा दर्जा उंचावला आहे. संघबांधणी चांगलीच झाली आहे. सामन्याच्या दिवशीच्या कामगिरीवर आणि प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याच्या वृत्तीवर संघाची वाटचाल अवलंबूनराहील. एखादा विशेष गोलंदाज विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरेल का, असे विचारताच ते म्हणाले,ह्यएखादा नव्हे तर सर्वच गोलंदाजांची सांघिक भूमिका संघाच्या यशासाठी कारणीभूत ठरेल. आमच्या तुलनेत आजच्या युवा गोलंदाजांमध्ये अधिकजोश आहे. आम्ही परिपक्व होतो तर आजचे गोलंदाज अधिक व्यावसायिक बनले आहेत. निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंच्या तुलनेत संघ निवडताना अनुुभवाला अधिक प्राधान्य दिले आहे. संघ निवडीबद्दल कपिल म्हणाले, निवडकर्त्यांवर टीका करणे योग्य नाही. युवा खेळाडूंना झुकते माप दिले असते तर अनुभवी खेळाडूंकडे डोळेझाक झाली, अशी टीका झाली असती. निवडकर्त्यांनी चांगला संघ निवडला, असे माझे मत आहे. भारताकडे अद्यापही कपिलसारखा अष्टपैलू गोलंदाज नाही. दुसरा कपिल कधी घडू शकतो, असे विचारताच ते म्हणाले, हे कठीण काम आहे. माझ्या तुलनेत सरस खेळाडू यावेत, असे मलादेखील वाटते. अश्विन आणि जडेजासारखे चांगले युवाअष्टपैलू खेळाडूंची संघाला गरज आहे.