शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

भारत-पाकिस्तान सामना धरमशाळाऐवजी इडन गार्डन्सवर

By admin | Published: March 09, 2016 3:32 PM

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये धरमशाळा येथे होणा-या सामन्याचे स्थळ आयसीसीने बदलले आहे. धरमशाळा ऐवजी कोलकात्यातील इडन गार्डन्स स्टेडियमवर नियोजित तारखेला हा सामना होईल.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ९ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये धरमशाळा येथे होणा-या सामन्याचे स्थळ अखेर आयसीसीने बदलले आहे. धरमशाळा ऐवजी कोलकात्यातील इडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना होईल. १९ मार्चलाच ठरलेल्या वेळेनुसार हा सामना खेळवला जाईल असे आयसीसीचे पदाधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले. 
सुरक्षेच्या कारणास्तव सामन्याचे नियोजित स्थळ बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला असे रिचर्डसन यांनी सांगितले. कोलकात्यातील ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवर  भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो अशी शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती. 
हिमाचलप्रदेश सरकारने सुरुवातीला सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था देण्यास नकार दिला होता. नंतर ते सुरक्षा देण्यास तयार होते. पण मंगळवारी पाकिस्तानातून आलेल्या व्दिसदस्यीय शिष्टमंडळाने धरमशाळा येथील स्टेडियमची पाहणी केल्यानंतर सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे धरमशाळाऐवजी कोलकात्याला सामना हलवला जाण्याची शक्यता होती. अखेर कोलकात्याला या सामन्याच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. 
भारत-पाकिस्तान मालिका आयोजनाची चर्चा करण्यासाठी मुंबईत आलेल्या पीसीबी अध्यक्षांची बीसीसीआय अध्यक्ष सशांक मनोहर यांच्या बरोबरची  बैठक शिवसैनिकांनी उधळल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीसीसीआय-पीसीबीची बैठक आयोजित करण्याची तयारी दाखवली होती. भारतात सर्व सामन्यांच्या स्थळी कडेकोट सुरक्षा बंदोबस्ताचे आम्हाला आश्वासन देण्यात आले आहे असे रिचर्डसन यांनी सांगितले.