शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

भारताचा मालिका विजय

By admin | Published: June 23, 2016 1:55 AM

टी-२० मालिकेचा अंतिम सामना म्हणून मानलेल्या लढतीत भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवित मालिका २-१ने खिशात घातली

हरारे : टी-टष्ट्वेन्टी मालिकेचा अंतिम सामना म्हणून मानलेल्या लढतीत भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवित मालिका २-१ने खिशात घातली. बरिंदर सरन याने मोक्याच्या क्षणी संतुलन ढळू न देता केलेल्या अचूक गोलंदाजीच्या बळावर भारताने शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वेची विकेट काढत ३ धावांनी विजय मिळविला. भारताने केदार जाधव (५८) याच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर २० षटकांत ६ बाद १३८ धावांचे आव्हान उभे केले. तुलनेने या सोप्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेला भारताने २० षटकांत ६ बाद १३५ धावांत रोखले. भारताच्या गोलंदादाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळविले होते. शेवटच्या षटकांत त्यांना विजयासाठी २१ धावा आवश्यक होत्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोणीने सरन याच्याकडे चेंडू सोपविला. पहिल्याच चेंडूवर टिमीसेन मारूमा (१३ चेंडूत नाबाद २३ धावा) षटकार खेचला. त्यानंतरचा चेंडू वाईड गेला. पाठोपाठच्या नो बॉलवर चौकार मारला. त्यामुळे एकाच वैध चेंडूवर झिम्बाब्वेला १२ धावा मिळाल्या. फ्री हिट व त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकण्यात सरनला यश मिळाले. त्यानंतर मारुमाने एक धाव घेत एल्टन चिगुंबुराकडे (१६ चेंडूत १६ धावा) पुढील जबाबदारी सोपविली. चिगुंबुराने पाचव्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर झिम्बाब्वेला चार धावांची आवश्यकता होती. अखेरच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चिगुंबुराने युजुवेंद्र चहलकडे झेल दिला. त्यामुळे त्यांना सामन्यासह मालिका देखील गमावली. चामू चिभाभा (५), हॅमिल्टन मसाकाद्झा (१५) ही सलामीची जोडी परतल्यानंतर वुसी सिबांदा (२८), पीटर मूर (२६) यांच्या खेळीने झिम्बाब्वेने विजयाचे आव्हान कायम ठेवले. तत्पूवी, भारताला सलामीवीर लोकेश राहुल (२२), मनदीप सिंग (४), अंबाती रायुडू (२०), मनिष पांडे (०) ठराविक अंतराने बाद झाले. त्या नंतर आलेल्या केदार जाधव याने ४२ चेंडूत ७ चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने ५८ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. अक्षर पटेल याने ११ चेंडूत एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद २० धावा फटकाविल्या. वनडेच्या तुलनेत टी-२० स्पर्धेत युवा खेळाडूंना अधिक शिकायला मिळाले. या खेळाडूंचा हा अनुभव त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. झिम्बाब्वे संघाने चांगले प्रदर्शन केले. या मालिकेतून संघाला १०-१२ गोलंदाजांची फळी तयार करण्यास मदत मिळाली आहे. वेगवान गोलंदाजीच्या विभागात आपल्याला चांगले खेळाडू तयार करण्याची आवश्यकता आहे. आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो, की आमच्याकडे खेळाडू असे आहेत जे देशासाठी आगामी काळात खेळू शकतात. वनडे मालिका ३-०ने जिंकल्यानंतर टी-२० मालिका २-१ ने जरी जिंकली असली, तरी संघातील सर्व खेळाडूंची कामगिरी चांगली झालेली आहे.- महेंद्रसिंह धोनी धावफलक : भारत : २० षटकांत ६ बाद १३८ धावा, लोकेश राहुल २२ त्रि.गो. मादझिव्हा, अंबाती रायुडु झे. एल्टन चिगुम्बुरा गो. ग्रॅमी क्रेमर २०, केदार जाधव झे. चिगुंबुरा गो. डोनाल्ड तिरिपानो ५८, एमएस धोणी त्रि.गो. तिरिपानो ९, अक्षर पटेल नाबाद नाबाद२०, धवल कुलकर्णी नाबाद १. झिम्बाब्वे : २० षटकांत ६ बाद १३५; चामू चिभाभा झे. यजुवेंद्र चहल गो. बरिंंदर शरण ५, हॅमिल्टन हसाकाद्झा पायचित गो. अक्षर पटेल १५, उसीसी सिबांदा पायचित गो. धवल कुलकर्णी २८, पीटर मूर झे. मनदीप सिंग गो. चहल २६, एल्टन चिगुम्बुरा झे. चहल गो. शरण १६, टिमीसेन मारुमा नाबाद २३.