शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

भारत - वेस्ट इंडिज कोण भिडणार अंतिम सामन्यात इंग्लडशी ?

By admin | Published: March 31, 2016 5:26 PM

सर्वांचे लक्ष असेल ते भारताच्या विराट कोहली आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांच्या खेळीकडे. या दोघांच्या कामगिरीवर दोन्ही संघांचा विजय अवलंबून असेल.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - टी २० विश्वचषक अंतिम टप्यात पोहटला आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा विजयी वारू रोखत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज मुंबईच्या वानखेने स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान टी २० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील दुसरा सामना होणार आहे. यामधून जिंकणारा संघ ३ तारखेला इंग्लडशी दोन हात करणार आहे. सर्वांचे लक्ष असेल ते भारताच्या विराट कोहली आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांच्या खेळीकडे. या दोघांच्या कामगिरीवर दोन्ही संघांचा विजय अवलंबून असेल. भारतीय आणि वेस्ट इंडिजची फलंदाजी पाहिली तरी ती २ खेळाडूच्या कामगीरीवर अवलंबून असल्याचे या विश्वचषकात दिसले आहे. भारतातर्फे जिगरबाज फलंदाज विराट कोहलीने सर्वोत्म कामगीरी करत भारताला उपांत्य सामन्यात पोहचवले तर विडिंजकडून ही कामगीरी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने केली आहे. त्यामुळे हे दोन फलंदाजापैकी जो सर्वोत्कृष्ट कामगीरी करेल तो संघ अंतिम सामन्यात धडक मारेल हे नक्की. 
भारतीय फलंदाजी तगडी आहे. घरच्या मैदानावर भारतीय फलंदाजांना लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. विराट कोहली सोडता एकाही भारतीय फलंदाजाने धावा जमवल्या नाहीत. आजच्या सामन्यात सर्व नजरा मुंबईकर फलंदाज रोहित शर्मो आणि ११ मध्ये जर संधी मिळाली तर रहाणे यांच्यावर असतील. या दोन्ही खेळाडूचे हे होम ग्राउंड आहे. 
 
या उपांत्य सामन्यात भारताला विजयासाठी फेव्हरेट मानण्यात येत असले तरी, वेस्ट इंडिजलाही कमी लेखून चालणार नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत टी-२०चे चार सामने झाले असून, त्यातील दोन्ही संघांची विजयाची टक्केवारी ५०-५० आहे. भारताने दोन तर, वेस्ट इंडिजने दोन सामने जिंकले आहेत.
टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांच्या उपांत्यफेरीचा रेकॉर्ड बघितल्यास भारताने उपांत्यफेरीतील विजयाचा रेकॉर्ड २-० आहे. २००७ मध्ये भारताने पहिल्यांदा डरबनमध्ये उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियावर १५ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ मध्ये ढाक्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर सहागडी राखून विजय मिळवला होता. 
याउलट वेस्ट इंडिजचा तीन पैकी दोन उपांत्यफेरीत पराभव झाला आहे. २०१२ मध्ये वेस्ट इंडिजने अंतिम फेरी गाठली होती. पण २००९ आणि २०१४ च्या उपांत्यफेरीत पराभव झाला होता. 
या वर्ल्‍डकपमध्ये वानखेडेवर झालेल्या चार सामन्यामध्ये १७७, १८२, २०९ आणि २२९ धावसंख्या उभारली गेली. त्यातील अफगाणिस्तानचा अपवाद वगळता तीनवेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने १७२ धावांपर्यंत मजल मारली होती. 
प्रतिस्पर्धी संघ -
भारत ...
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, हरभजनसिंग, रविचंद्रन आश्विन, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, पवन नेगी, मोहमद शमी.
वेस्ट इंडिज ...
डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युएल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, लेंडल सिमन्स, ख्रिस गेल, जेसन होल्डर, एव्हिन लुईस, अ‍ॅश्ले नर्स, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, मरलॉन सॅम्युएल्स, जेरोम टेलर .