शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
3
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
4
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
5
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
6
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
7
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
8
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
9
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
10
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
11
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
12
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
14
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
15
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
16
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
17
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
18
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
19
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
20
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

भारताने सलग तिस-यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक

By admin | Published: October 22, 2016 9:22 PM

भारताने सलग तिस-यांदा कबड्डी विश्वचषक जिंकत विजयगाथा कायम ठेवली आहे. भारताने 38-29 फरकाने इराणचा पराभव केला

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 22 - भारताने सलग तिस-यांदा कबड्डी विश्वचषक जिंकत विजयगाथा कायम ठेवली आहे. भारताने 38-29 फरकाने इराणचा पराभव केला . कबड्डी विश्वचषक जिंकण्याचा हॅट्र्टिक साधत भारताने आपणच कबड्डीचे बादशाह असल्याचं दाखवून दिलं आहे. पहिल्या हाफमध्ये 18-13 गुणांसहित आघाडीवर असलेल्या इराणला त्यानंतर आघाडी कायम ठेवता आली नाही. भारताकडून अजय ठाकूरने विजयात महत्वाचा वाटा उचलला. अजय ठाकूरने 16 रेड्समध्ये 12 गुण मिळवले. सुरुवातीला अटीतटीचा वाटणारा सामना भारताने शेवटच्या टप्प्यात मात्र सहज जिंकला. भारत पुन्हा एकदा विजेता ठरला असून इराण उपविजेता झाला आहे. 
 
भारताने शुक्रवारी धडाकेबाज विजयाच्या बळावर स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती. यजमान भारतीय संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात थायलंडवर ७३-२० ने मात केली होती. दुसरीकडे इराण संघाने सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाचा २८-२२ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. 
 
महाराष्ट्रात पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा झाल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर अहमदाबादमध्ये भारतीय संघाने इराणसोबत पंगा घेतला. महाराष्ट्राच्या यजमानपदाखाली २००४ आणि २००७ मध्ये पुरुषांच्या पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा रंगल्या होत्या. यामध्ये दोन्ही वेळा इराण आणि भारत हे दोन संघच समोरासमोर दिसले होते. भारताने इराणवर निर्विवाद वर्चस्व मिळवत दोन्हीवेळा विश्वचषकावर कब्जा मिळविला. भारताने ही विजयी गाथा पुन्हा एकदा कायम राखली आहे. 
 
भारताने पहिल्या विश्वचषकामध्ये इराणला ५५-२७ अशा मोठ्या फरकाने पराभूत करत पहिल्या विश्वकपावर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर तब्बल तीन वर्षाच्या खंडानंतर मुंबईमध्ये दुसऱ्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले. यावेळीही इतर संघाच्या तुलनेत पहिल्या विश्वचषकामध्ये दावेदारी सिद्ध केलेल्या भारत आणि इराक दुसऱ्यांदा समोरा समोर आले. यावेळीही भारताने विजय मिळवत इराणला पराभूत केले. पनवेलच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या विश्वकपच्या अंतिम सामन्यात भारताने इराणला २९ – १९ अशा फरकाने पराभूत केले होते.