शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भारतीय खेळाडू टोकियोला पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:45 IST

कोरोना महामारीदरम्यान होत असलेल्या या स्पर्धेसाठी भारताच्या ८ खेळांचे संघ विशेष विमानाने टोकियोला उतरले.

टोकियो : आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकण्याचा निर्धार केलेल्या भारतीय खेळाडूंचा पहिला संघ रविवारी सकाळी टोकियोत पोहोचला. कोरोना महामारीदरम्यान होत असलेल्या या स्पर्धेसाठी भारताच्या ८ खेळांचे संघ विशेष विमानाने टोकियोला उतरले. यामध्ये तिरंदाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, ज्यूदो, जिम्नॅस्टिक, जलतरण आणि भारोत्तोलन या खेळांचे खेळाडू, सहयोगी स्टाफ आणि अधिकारी यांचा समावेश आहे.

टोकियोमध्ये पोहोचलेल्या भारताच्या ८८ सदस्यांच्या पहिल्या संघात ५४ खेळाडूंसह सहयोगी स्टाफ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) प्रतिनिधी यांचा समावेश आहे. विमानतळावर कुरोबे शहराच्या प्रतिनिधींनी भारतीय संघाचे दणक्यात स्वागत केले. ‘कुरोबे शहर भारतीय संघाचे स्वागत करत आहे. चिअर्स फॉर इंडिया,’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन यजमानांनी भारतीयांचे स्वागत केले. याआधी, शनिवारी रात्री क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी इंदिरा गांधी विमानतळावर भारतीय संघाला जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

सावध राहावे लागेल; ऑस्ट्रेलियन प्रमुखाची चिंता

- ऑलिम्पिक क्रीडागावामध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने आता अधिक सतर्क राहावे लागेल, असे मत ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक संघाचे प्रमुख इयान चेस्टरमॅन यांनी व्यक्त केले. 

- ऑस्ट्रेलियाने ऑलिम्पिकसाठी ४८७ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. आतापर्यंतचा ऑस्ट्रेलियाचा हा सर्वांत मोठा संघ आहे. ऑस्ट्रेलियाच्या २०० खेळाडूंचा पहिला संघ शनिवारी टोकियो येथे पोहोचला. चेस्टरमॅन यांनी सांगितले की, ‘क्रीडागावात कोरोनाचे संक्रमण होण्याची असलेली शक्यता आम्ही आधीपासूनच गृहीत धरली होती. त्यामुळेच क्रीडागावातील आमच्या योजना तयार आहेत. 

- आयओसीच्या निर्देशांवरही आमचा विश्वास आहे. अद्याप संक्रमित व्यक्तींची ओळख पटली नसून, त्यांच्या संपर्कातील लोकांचीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आता अधिक सतर्कता बाळगावी लागेल.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020