शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात

By admin | Published: March 28, 2016 3:30 AM

निराशाजनक प्रदर्शन कायम राहिल्याने भारताच्या महिला संघाला वेस्ट इंडीजविरुद्ध ३ धावांनी पराभव पत्करावा लागला. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील हा अखेरचा साखळी सामना

मोहाली : निराशाजनक प्रदर्शन कायम राहिल्याने भारताच्या महिला संघाला वेस्ट इंडीजविरुद्ध ३ धावांनी पराभव पत्करावा लागला. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील हा अखेरचा साखळी सामना गमावल्यानंतर, यजमान भारताचेही आव्हान संपुष्टात आले आहे. गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यानंतर, फलंदाजांनी नांगी टाकल्याने भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले.पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडीजच्या डिंड्रा डॉट्टीन हिने निर्णायक अष्टपैलू खेळ करताना भारताला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजचा डाव २० षटकांत ८ बाद ११४ असा मर्यादित धावसंख्येत रोखण्यात भारताला यश आले. हरमनप्रीत कौर (४/२३) आणि अनुजा पाटील (३/१६) यांनी टिच्चून मारा करताना विंडीजला रोखले. त्याचवेळी सलामीवीर व कर्णधार स्टेफनी टेलर (४५ चेंडूंत ४७) आणि डिंड्रा (४० चेंडंूत ४५) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे विंडीजला शतकी मजल मारता आली. या दोघींव्यतिरीक्त इतर कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले नाही.यानंतर छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव ९ बाद १११ धावांमध्ये रोखून विंडीजने रोमांचक बाजी मारली. डिंड्राने (३/१६) गोलंदाजीतही चमक दाखवताना तिघींना बाद करून भारताला जखडवून ठेवले. अ‍ॅफी फ्लेचरनेही (२/१५) चांगला मारा केला. भारताची कर्णधार मिताली राज डावातील पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाली. त्या धक्क्यातून भारतीय अखेरपर्यंत सावरलेच नाही. स्मृती मानधना (२२), अनुजा पाटील (२६) आणि झूलन गोस्वामी (२५) यांनी चांगला प्रतिकार केला. वेदा कृष्णमूर्तीनेही १८ धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्याने त्यांची लढत अपयशी ठरली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :वेस्ट इंडीज : २० षटकांत ८ बाद ११४ धावा (स्टेफनी टेलर ४७, डिंड्रा डॉट्टीन ४५; हरमनप्रीत कौर ४/२३, अनुजा पाटील ३/१६) वि.वि. भारत : २० षटकांत ९ बाद १११ धावा (अनुजा पाटील २६, झूलन गोस्वामी २५, स्मृती मानधना २२; डिंड्रा डॉट्टीन ३/१६, अ‍ॅफी फ्लेचर २/१५)