शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

तिरंदाजी विश्वचषकात भारताला सुवर्णपदक

By admin | Published: May 21, 2017 1:25 AM

येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताच्या पुरु ष संघाने कम्पाऊंड प्रकारात ‘गोल्ड’न कामगिरी केली. अभिषेक वर्मा, राजू चिन्ना श्रीधर आणि पदार्पण

शांघाय : येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताच्या पुरु ष संघाने कम्पाऊंड प्रकारात ‘गोल्ड’न कामगिरी केली. अभिषेक वर्मा, राजू चिन्ना श्रीधर आणि पदार्पण करणारा अमनजितसिंग यांच्या या त्रिकुटाने जबरदस्त कामगिरीच्या बळावर दहाव्या रँकिंगवरील कोलंबियाचा अंतिम सामन्यात पराभव केला. चुरशीच्या लढतीत भारताने कोलंबियाला २२६-२२१ अशा गुणफरकाने धूळ चारली.सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी बहारदार कामगिरी केली. अभिषेक वर्मा, राजू चिन्ना श्रीधर आणि अमनजितसिंग यांनी अखेरच्या क्षणी निर्णायक गुण नोंदविले. भारताने पहिला सेट ५८-५७ असा जिंकला. नंतर तिन्ही सेटमध्येदेखील बाजी मारली. दरम्यान, तिसरा सेट कोलंबियाच्या खेळाडूंनी ५२-५२ असा ‘टाय’ केला. पराभूत कोलंबिया संघात कामिलो आंद्रेस कार्डोना, जोस कार्लोस ओस्पिना आणि डॅनियल मुनोज यांचा समावेश होता.त्याआधी भारताने व्हिएतनाम, इराण आणि अमेरिकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. वर्माने प्रथमच सांघिक सुवर्ण जिंकले. विश्वचषकात त्याचे हे दुसरे सुवर्ण ठरले. तो म्हणाला, ‘येथे दाखल होण्याआधी आम्ही बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास केला. आठवडाभर सरावादरम्यान गुण वाढविण्यावर भर देत होतो.’ २०१४ च्या इंचियोन आशियाडमध्ये त्याला रौप्यावर समाधान मानावे लागले होते.दुसरीकडे मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत दिल्लीचा २७ वर्षांचा अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीचा कोरियाने १५३-१५१ अशा गुणफरकाने पराभव केला होता. आता कांस्यपदकासाठी ही जोडी अमेरिकेशी भिडणार आहे.दरम्यान, रिओ आॅलिम्पिकनंतर पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत सहभागी झालेल्या अतानु आणि दीपिका कुमारी यांनी रिकर्व्ह प्रकारात निराशा केली. उपांत्यपूर्व फेरीत अतानुचा नेदरलँडच्या स्टीव्ह विलेयरने पराभव केला. दीपिकालाही पराभवाचा सामना करावा लागला. (वृत्तसंस्था)