शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

भारताची ऐतिहासिक कामगिरी

By admin | Published: July 11, 2017 1:59 AM

गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. यंदा अव्वल खेळाडूंनी घेतलेल्या माघारीमुळे स्पर्धेला ग्लॅमर कमी मिळाले

भुवनेश्वर : यजमान भारताने २२ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अजिंक्य कामगिरी करताना पहिल्यांदाच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. यंदा अव्वल खेळाडूंनी घेतलेल्या माघारीमुळे स्पर्धेला ग्लॅमर कमी मिळाले. भारताने या वेळी लक्षवेधी कामगिरी करताना बलाढ्य चीनच्या वर्चस्वाला धक्का दिला. दखल घेण्याची बाब म्हणजे १९८३ पासून या स्पर्धेत कायम अग्रस्थानी राहिलेल्या चीनची यंदा भारताच्या धडाक्यापुढे पीछेहाट झाली. या स्पर्धेत भारताने विक्रमी पदकांची कमाई करताना १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि १२ कांस्य अशी २९ पदकांची लयलूट केली. सहा जुलैला सुरू झालेल्या या चारदिवसीय स्पर्धेत भारताने पहिल्या दिवसापासून राखलेले वर्चस्व अखेरच्या दिवसापर्यंत कायम राखताना बाजी मारली. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही काही स्टार्स खेळाडूंनी या स्पर्धेकडे पाठ फिरवली असल्याने त्याचा काहीसा फरक स्पर्धेवर नक्कीच पडला. लंडनमध्ये होत असलेल्या आगामी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या तयारीसाठी चीन, जपान, कतार आणि बहारिनच्या काही अव्वल खेळाडूंनी आशियाई स्पर्धेतून आधीच माघार घेतली होती. या स्पर्धेत ४३ देशांतील एकूण ५६२ अ‍ॅथलिट्स सहभागी झाले होते. दरम्यान, स्पर्धा समारोपाच्या दिवशी आशियाई अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष दहलान अल हमद यांनी ओडिशा सरकार आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे आभार व्यक्त करताना म्हटले की, ‘‘स्पर्धा शानदारपणे पार पडली. तुम्ही स्पर्धेचा स्तर आणखी वाढवला.’’ (वृत्तसंस्था)>पदकविजेत्यांचा गौरवओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील भारताच्या सर्व पदकविजेत्यांना रोख पुरस्कार देऊन त्यांचा सम्मान केला. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना १० लाख, तर रौप्य आणि कांस्यविजेत्यांना अनुक्रमे ७ व ५ लाख रुपये देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा समारोप झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी कलिंग स्टेडियमवर झालेल्या विशेष कार्यक्रमादरम्यान पटनायक यांनी पदकविजेत्या खेळाडूंचा सम्मान केला. या वेळी भालाफेक सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्राने म्हटले, ‘मुख्यमंत्री पटनायक यांच्याद्वारे झालेल्या सम्मानाने मी खूप आनंदी आहे. या आर्थिक पुरस्काराचा मला पुढील स्पर्धेच्या तयारीसाठी खूप फायदा होईल. मी कलिंग स्टेडियमला कधीच विसरू शकत नाही.’ >वातावरणाचा परिणामया स्पर्धेदरम्यान राहिलेल्या उष्ण व दमट वातावरणाचा खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम झाला. स्पर्धेच्या चार दिवसांदरम्यान केवळे एकच मीट रेकॉर्ड नोंदला गेला. भारतीय संघाचा कर्णधार आणि स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने हा विक्रम रचला. भारताने कामगिरी उंचावली...स्पर्धेत यजमान भारताने चांगलेच वर्चस्व राखले. स्पर्धा इतिहासात आजपर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी करताना भारतीयांनी सुपरपॉवर चीनला नमवले. या वर्षी भारताने आपला सर्वाधिक ९४ खेळाडूंचा चमू स्पर्धेत उतरवला होता. याआधी जकार्ता १९८५ च्या स्पर्धेत भारताने २२ पदके मिळवत चांगली कामगिरी केली होती. तो विक्रम या वेळी भारतीयांनी मोडला. आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी, देशासाठी गर्वाची बाब, सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि शुभेच्छा.- विजय गोयल, केंद्रीय क्रीडामंत्रीभारताला अव्वल स्थानी आणल्याबद्दल सर्व अ‍ॅथलिट्सचे अभिनंदन. सर्वांचा खूप गर्व आहे. - वीरेंद्र सेहवाग,माजी क्रिकेटपटू