शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतच बलवान संघ - कुमार संगकारा

By admin | Published: May 30, 2017 2:35 PM

ले. भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक आहे.

 ऑनलाइन लोकमत 

कोलंबो, दि. 30 - गतविजेता भारतच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारताकडे जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केले. भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक आहे असे संगकाराने सांगितले. यंदाच्यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आशियातून चार संघ सहभागी झाले असून, भारताचा संघ सर्वाधिक सशक्त आहे. 
 
2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आताही भारतामध्ये विजेतेपद मिळवण्याची क्षमता आहे असे संगकाराने आयसीसीच्या वेबसाईटवर लिहीलेल्या स्तंभामध्ये म्हटले आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा हे भारताचे फिरकी गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपयुक्त कामगिरी करत असून, कर्णधार विराट कोहली भले आयपीएलमध्ये अपयशी ठरला असेल पण इथे तो दमदार कामगिरी करेल असे संगकाराला विश्वास वाटतो. 
 
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उपांत्यफेरीचे सामने रंगतील असे भाकीत संगकाराने वर्तवले आहे. श्रीलंकेने 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती तर, 2014 मध्ये टि-20 वर्ल्डकप जिंकला होता. संगकाराने दोनवर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून संगकाराने 28,016 धावा केल्या आहेत. 
 
काही काळापूर्वी एक ते दोन संघांचेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व होते. पण आता अनेक संघांनी आपल्यामध्ये प्रगती केली असून, चार ते पाच संघ समानपातळीचे आहेत असे संगकाराने म्हटले आहे. इंग्लंडच्या एकदिवसीय संघाने मागच्या दोनवर्षात चांगली प्रगती केली आहे. रणनिती आणि अन्य आघाडयांवर हा संघ इतरांपेक्षा पिछाडीवर असायचा पण आता त्यांनी चांगली प्रगती केली आहे. इंग्लंडसंघामध्ये गुणवान खेळाडू असून ते आक्रमक क्रिकेट खेळत आहेत असे संगकाराने सांगितले. 1 जून पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून, भारताचा सलामीचा सामना 4 जूनला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. 
 
रोहित सलामीसाठी सज्ज
रोहित शर्मा सलामीवीर म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी भारतीय संघ आज (मंगळवारी) बांगलादेशविरुद्ध अखेरचा सराव सामना खेळणार आहे. या लढतीच्यानिमित्ताने रोहितला सलामीवीर म्हणून सराव करण्याची चांगली संधी मिळणार आहे.