शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

भारताची विजयी सलामी

By admin | Published: April 07, 2016 2:11 AM

२५ व्या सुलतान अझलान शाह ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने बुधवारी जपानला २-१ असे पराभूत केले. कर्णधार सिंगने निर्णायक वेळी गोल करीत पिछाडीवर पडलेल्या भारताला विजय मिळवून दिला

इपोह (मलेशिया) : येथे सुरू झालेल्या २५ व्या सुलतान अझलान शाह ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने बुधवारी जपानला २-१ असे पराभूत केले. कर्णधार सरदार सिंगने निर्णायक वेळी गोल करीत पिछाडीवर पडलेल्या भारताला विजय मिळवून दिला. जपानच्या अनुभवी संघाने भारताला विजयासाठी झुंझवले. या सामन्याद्वारे जपानच्या नऊ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले.या सामन्यात भारताला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या; मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. जपानविरुद्ध भारताला मोठा विजय संपादन करता आला असता; मात्र भारतीय खेळाडूंची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नाही. आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्या संघाविरुद्ध मोठा विजय मिळवण्याची संधी भारताने घालवली. भारताचा तरुण खेळाडू हरमनप्रीत सिंग व कर्णधार सरदार सिंग यांनी गोल केले; तर जपानकडून एकमेव गोल केंजी किताजातो याने केला.सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीयांनी आक्रमणाचे धोरण अवलंबले होते. मात्र, जपानच्या बचावपटूंनी भारताच्या आघाडीच्या खेळाडूंना गोल करण्याची संधी दिली नाही. सामन्याच्या १३ व्या मिनिटाला रमनदीपने दिलेल्या पासवर सुनीलने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या बारला लागून बाहेर गेला. त्यानंतर जपानने आक्रमण करीत १७ व्या मिनिटाला गोल करीत भारतीय गोटातील चिंता वाढवली. जपानला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर केंजी याने गोलमध्ये करीत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र भारताने सावध खेळास प्रारंभ केला. २४ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात मनदीपला यश आले नाही. मात्र, लगेचच पुढच्या मिनिटात भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगने जपानच्या गोलकिपरला चकवत गोल केला व भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. या गोलनंतर भारताने आपल्या आक्रमणाची धार वाढवली. कर्णधार सरदार सिंगने रचलेल्या चालीमुळे जपानच्या बचावपटूंवर दबाव आला. सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला सरदार सिंगने आपल्या रिव्हर्स फ्लिकची करामत दाखवत जपानच्या गोलकिपरला चकवले. जसजित सिंगच्या पासवर सरदारने केलेल्या गोलमुळे भारताला २-१ अशी आघाडी मिळाली. सामना संपेपर्यंत ही आघाडी कायम राहिली. (वृत्तसंस्था)