शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
3
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
4
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
5
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
6
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
7
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
8
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
9
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
10
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
11
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
12
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
13
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
14
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
15
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
16
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
17
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
18
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
19
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
20
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

भारताचा यूएईवर दणदणीत विजय

By admin | Published: March 03, 2016 6:55 PM

भारताने नऊ गडी आणि ५९ चेंडू राखून संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजयाची नोंद केली. यूएईचे ८२ धावांचे माफक लक्ष्य भारताने आरामात पार केले.

ऑनलाइन लोकमत

मिरपूर, दि. ३ - सलामीवर रोहित शर्माची २८ चेंडूतील ३९ धावांची खेळी आणि त्यानंतर युवराज सिंगने केलेली फटकेबाजी याच्या जोरावर भारताने नऊ गडी आणि ५९ चेंडू राखून संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजयाची नोंद केली. यूएईचे ८२ धावांचे माफक लक्ष्य भारताने आरामात पार केले.
भारताने आशिया कप टी-२० स्पर्धेची आधीच अंतिम फेरी गाठल्याने आजचा सामना फक्त औपचारीकता होता. मात्र या सामन्यातही भारताने प्रतिस्पर्ध्यांना कुठलीही दयामाया दाखवली नाही. भारताने स्पर्धेत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी आहे. 
संयुक्त अरब अमिरातीच्या ८२ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली मात्र रोहित शर्माच्या रुपाने भारताला ४३ धावांवर पहिला धक्का बसला. 
रोहित ३९ धावांवर बाद झाला. कादीर अहमदने मोहम्मद नावीदकरवी त्याला झेलबाद केले. आता डावखुरा युवराज सिंग आणि सलामीवर शिखर धवनची जोडी मैदानावर असून, भारताची वेगाने लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भारताच्या आठ षटकात ६२ धावा झाल्या असून, विजयासाठी फक्त २० धावांची आवश्यकता आहे. प्रथम फलंदाजी करणा-या संयुक्त अरब अमिरातीने निर्धारीत वीस षटकात ९ बाद ८१ धावा करुन भारताला विजयासाठी माफक ८२ धावांचे लक्ष्य दिले आहे. शाईमन अन्वरचा ४३ धावांचा अपवाद वगळता यूएईचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर तग धरु शकला नाही. 
यूएईकडून सलामीवीर रोहन मुस्तफा आणि शाईमन अन्वरमध्ये तिस-या विकेटसाठी झालेली २३ धावांची भागीदारी सर्वाधिक ठरली. अन्वर खालोखाल मुस्तफाने सर्वाधिक ११ धावा केल्या. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर यूएईचा संघ ढेपाळला. 
यूएईच्या सात षटकात दोन बाद २५ धावा झाल्या होत्या. अवघ्या एका धावेवर सलामीवीर एसपी पाटील बाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.
पाठोपाठ मोहम्मद शहजाद भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्याला बुमराहने रैनाकरवी झेलबाद केले. रोहन मुस्तफा ११ आणि शाईमन अन्वर ७ धावांवर खेळत आहेत. 
भारत आणि दुबळया संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया कप टी-२० स्पर्धेतील आजचा शेवटचा साखळी सामना होत आहे. यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने आधीच अंतिम फेरी गाठली आहे आणि यूएईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 
त्यामुळे हा सामना फक्त औपचारीकता आहे. बांगलादेश विरुद्ध अंतिम फेरीचा सामना खेळण्याआधी या सामन्यात भारताने संघात काही बदल केले आहेत. 
मागच्या काही सामन्यांपासून राखीव खेळाडूंमध्ये बसलेल्या पवन नेगी, हरभजन सिंग आणि भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश केला आहे. या सामन्याव्दारे पवन नेगी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदापर्ण करत आहे. 
 
युएईविरुद्धचा भारतीय संघ - शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंड्या, पवन नेगी, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.