शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

वादाच्या भोवऱ्यात आयपीएल...

By admin | Published: July 15, 2015 1:10 AM

गुणावान क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे यासाठी सुरु करण्यात आलेली इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धा कायमच वादात राहिली आहे. मॅच फिक्सिंग, खेळाडूंचे वर्तन

मुंबई : गुणावान क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे यासाठी सुरु करण्यात आलेली इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धा कायमच वादात राहिली आहे. मॅच फिक्सिंग, खेळाडूंचे वर्तन व नियमांचे पालन न केल्याने काही संघांवर करण्यात आलेली कारवाई अशा विविध वादाच्या भोवऱ्यात आयपीएल गटांगळ््या खात असल्याचे चित्र आहे. भारताला २००७ सालच्या विश्वचषक स्पर्धेत मानहानीकारक पराभवाचे तोंड पहावे लागले होते. त्यानंतर बीसीसीआयने गुणवान खेळाडूंना व्यासपीठ मिळावे व त्याचा फायदा भारतीय क्रिकेटला व्हावा या साठी आयपीएल सुरु कले. अर्थात त्या पूर्वी एस्सेल ग्रुपने नुकतेच इंडियन क्रिकेट लीग सुरु केले होते. मात्र बलाढ्य बीसीसीआयची धन ताकद व प्रभावा समोर ही लीग लवकरच बसनात गुंडाळल्या गेली. आयपीएलला पदार्पणातच मोठी प्रसिद्धी व लोकप्रियता मिळाली. ललित मोदी यांनी आयपीएलची सुरुवात केली. लाखो डॉलरमध्ये ८ संघांची विक्री झाली. त्या वेळी महेंद्रसिंह धोणी हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. इंडिया सिमेंटची मालकी असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा तो एक भाग झाला. सुरुवातीस एकत्र असलेले मोदी व इंडिया सिमेंटचे तत्कालिन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यातील दुरावा वाढला. पाठोपाठ दुसऱ्याच वर्षी आयपीएलचे आयोजन वादात सापडले. देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे त्या वेळी स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आली. पुढील वर्षी स्पर्धा पुन्हा भारतात झाली. मात्र त्या वेळी आर्थिक अनियमिततेमुळे मोदी यांना आयपीएल मधूनच नव्हे तर बीसीसीआयमधून दूर सारण्यात आले. आता अंडर वर्ल्डकडून धोका असल्याने मोदी लंडनमध्ये जाऊन बसले आहेत. सुरुवातीला डेक्कन चार्जर्स संघाची जागा सनरायझर्स हैदराबादने घेतली. केरला टस्कर व सहारा पुणे वॉरियर्स या संघांना आयपीएल नियमांचे पालन न केल्याने बीसीसीआयने त्यांची मान्यता रद्द केली. मैदानाबाहेरील वाद सुरु असताना मैदानातील वादही समोर येत होते. हरभजन सिंग व श्रीसंत यांची ‘थप्पड की गुंज’ चर्चेत राहिली. फिक्सिंग प्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली. आता तर खुद्द चेन्नई सुपर किंग्जचे मालक गुरुनाथ मयप्पन व राजस्थान रॉयल्सचे राज कुंद्रा यांच्यावर सट्टेबाजीचे आरोप सिद्ध झाल्याने त्यांच्यावर न्यायालयाने आजीवन बंदी घातली आहे. (वृत्तसंस्था)