शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

इराणी ट्रॉफी शेष भारताकडे

By admin | Published: January 25, 2017 12:31 AM

वृद्धीमान साहाचे द्विशतक (२०३) व चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ११६ धावांच्या जोरावर शेष भारत संघाने गुजरातचा सहा गडी राखून पराभव

मुंबई : वृद्धीमान साहाचे द्विशतक (२०३) व चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ११६ धावांच्या जोरावर शेष भारत संघाने गुजरातचा सहा गडी राखून पराभव करत इराणी ट्रॉफी पटकावली.साहाने १२३ तर पुजाराने ८३ धावांवरुन आज सुरुवात केली. पुजारा व साहा यांनी पाचव्या गड्यासाठी ३१६ धावांची भागीदारी केली. स्पर्धेच्या इतिहासातील ही दूसऱ्या क्रमांकाची भागीदारी आहे. यापुर्वी रवि शास्त्री व प्रविण आम्रे यांनी १९९० मध्ये शेष भारताविरुद्ध चौथ्या क्रमांकासाठी ३२७ धावांची भागीदारी केली होती.रणजी विजेत्या गुजरातच्या गोलंदाजांनी या दोन्ही फलंदाजांना विशेष अडचणीत आणले नाही. पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतलेल्या गुजरातने कठीण लक्ष्य दिले होते. मात्र या दोघांच्या फलंदाजीसमोर हे अवघड लक्ष्य एकदम सोपे बनले. पुजाराने २३० चेंडूचा सामना केला तर साहाने २७२ चेंडूचा सामना केला.शेष भारताचा विजय कालच निश्चित झाला होता. शेष भारताचा संघ एकवेळेस चार बाद ६३ धावांवर लडखडला होता. मात्र साहा व पुजाराने संघाला अडचणीतून बाहेर काढले. गुजरातने पहिल्या डावात ३५८ तर शेष भारतने २२६ धावा केल्या होत्या. गुजरातने दुसऱ्या डावात २४६ धावा करत शेष भारतला ३७९ धावांचे लक्ष्य दिले होते. शेष भारताने १९ पैकी १५ वेळा इराणी ट्रॉफी जिंकली आहे. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक-गुजरात पहिला डाव १०२.५ षटकांत सर्वबाद - ३५८़, दुसरा डाव ९०.३ षटकात सर्वबाद २४६ धावा. शेष भारत पहिला डाव : ७५ षटकांत सर्व बाद २२६ धावा़,दुसरा डाव १०३ .१ षटकांत ४ बाद ३७९ धावा. (चेतेश्वर पुजारा नाबाद ११६, वृद्धिमान साहा नाबाद २०३ हार्दिक पटेल २/१०४)़