शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
4
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
5
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
6
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
7
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
8
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
9
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
10
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
11
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
12
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
13
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
14
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
15
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
16
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
17
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
18
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
19
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
20
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

जडेजाचा 'षटकार', कांगारूंकडे 87 धावांची आघाडी

By admin | Published: March 06, 2017 11:39 AM

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरूत सुरू असलेल्या दुस-या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताला ऑस्ट्रेलियाचा डाव 276 धावांमध्ये रोखण्यात यश

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 6 - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरूत सुरू असलेल्या दुस-या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताला ऑस्ट्रेलियाचा डाव 276 धावांमध्ये रोखण्यात यश आलं.  फिरकीपटू रविद्र जडेजाच्या भेदक मा-याच्या जोरावर भारताने कांगारूंचा डाव संपुष्टात आणला. जडेजाने  63 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतावर 87 धावांची आघाडी घेतली आहे. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात चांगली झाली आहे. सध्या मैदानावर सलामीवीर लोकश राहुल(20) आणि अभिनव मुकुंद(16) खेळत असून भारताच्या बिनबाद 38 धावा झाल्या आहेत.
 
कालच्या  6 बाद 237 धावांहून पुढे खेळताना कांगारूंनी सुरूवातीला सावध पवित्रा घेतला. काल नाबाद असलेले स्टार्क आणि वेड यांनी आघाडी 50 धावांच्या पुढे नेली. संघाच्या 269 धावा असताना अश्विनने स्टार्कला (26) बाद करत ही जोडी फोडली आणि पुढच्या अवघ्या 8 धावांमध्ये कांगारूंचा डाव जडेजाने संपुष्टात आणला.  
 
त्यापुर्वी काल सलामीवीर मॅट रेनशॉ व शॉन मार्श यांची झुंजार अर्धशतकी खेळी, भारताचे सुमार क्षेत्ररक्षण आणि डीआरएसच्या चुकीचा लाभ घेत ऑस्ट्रेलियाने रविवारी पहिल्या डावात आघाडी घेतली आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर वर्चस्व कायम राखले होते. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 237 धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 48 धावांची आघाडी घेतली होती. पुणे कसोटीत 333 धावांनी पराभव स्वीकारणारा भारतीय संघाचा पहिला डाव 189 धावांत संपुष्टात आला आहे.