शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

विजयाचे श्रेय जसप्रीत बुमराहला...

By admin | Published: March 26, 2016 2:15 AM

बांगलादेशने पुन्हा एकदा तोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावण्याची संधी दिली; पण भारतीय संघ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर का खेळत आहे, हे न उलगडणारे कोडं आहे.

- वासिम आक्रम लिहितो़...

बांगलादेशने पुन्हा एकदा तोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावण्याची संधी दिली; पण भारतीय संघ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर का खेळत आहे, हे न उलगडणारे कोडं आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांनाही बरोबरीची संधी मिळते. बांगलादेशविरुद्ध भारताने पाटा खेळपट्टीवर खेळायला पाहिजे होते. भारतीय संघाला फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सल्ला कोण देत आहे? बांगलादेशविरुद्धचा भारताचा विजय हा चमत्कार होता. बांगलादेशने अनेक चुका केल्या. अखेरच्या षटकात तीन चेंडंूवर ९ धावा वसूल केल्यानंतर महमुदुल्ला व मुशफिकर यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजांना अशा प्रकारचे फटके खेळण्याची गरजच नव्हती. दडपणाखाली हा संघ ढेपाळला.टी-२० क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळपट्टीवर १४५ धावांच्या लक्ष्याचा बचाव करणे कठीण असल्याची भारताला चांगली कल्पना होती; पण अखेर यजमान संघ नशिबवान ठरला. पंड्याने अखेरचा चेंडू ‘लेंथ बॉल’ केला; पण बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजाने स्टम्प कव्हर न केल्यामुळे त्याला विजयासाठी आवश्यक धावा फटकावता आल्या नाहीत. ही बाब कुणी प्रशिक्षक सांगू शकत नाही. तळाच्या फलंदाजांना मर्यादा ओलांडून विचार करण्याची गरज आहे. धोनी नेहमी आकलनापलीकडचा विचार करतो. पंड्या लेंथ चेंडूने फलंदाजाला बिट करण्यात यशस्वी ठरल्यामुळे यजमान संघ नशिबवान ठरला. शिवाय धोनीने सुरुवातीला ग्लोव्हज् काढून घेत हुशारीची प्रचिती दिली. भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळविला असला तरी यजमान संघाला अद्याप या स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बुमराहने १९ व्या षटकांत चांगला मारा केला. भारताने त्याला १९ वे षटक टाकण्याची संधी दिली, हे चांगले झाले. जर पंड्याने १९ व्या षटकांत गोलंदाजी केली असती, तर सामना त्याच षटकांत संपला असता. बुमराहने दडपण झुगारत चांगले यॉर्कर टाकले. दुसऱ्या बाजूचा विचार करता पाकिस्तान संघ सध्या दडपणाखाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध या संघाने विजयाची संधी गमावली. अहमद शहजाद व उमर अकमल यांना फुलटॉस चेंडूंवर बाउंड्री लगावता आली नाही. (टीसीएम)