शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

‘खेलो इंडिया’ची १०० केंद्रं महाराष्ट्रात हवी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करणार विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:24 IST

केंद्र शासनाने ‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत देशभरात एक हजार क्रीडा केंद्रउभारण्याची योजना आखली असून त्यातील मोजकीच केंद्र महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहेत.

या केंद्रांतर्गत आर्चरी, अ‍ॅथ्लेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, सायकलिंग, तलवारबाजी, हॉकी, ज्युडो, रोर्इंग, शुटिंग, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, फुटबॉल आणि पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे.केंद्र शासनाने ‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत देशभरात एक हजार क्रीडा केंद्रउभारण्याची योजना आखली असून त्यातील मोजकीच केंद्र महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहेत. राज्यातील १२.३ कोटी लोकसंख्येचा विचार करता यातील किमान शंभर केंद्र महाराष्ट्रात होणे काळाची गरज आहे. मात्र ‘खेळ’ हा लोकप्रतिनिधींच्या जिव्हाळ्याचा तसेच प्राधान्यक्रमाचा विषय नसल्याने पाठपुरावा करण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही.

सरकारने २३ ऑगस्ट २०१८ लायासंदर्भात सर्व राज्यांना नियमावली पाठवून खेळप्रकार निवडण्यास सांगितले होेते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा उपसचिवांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे (साई) ७ आॅगस्ट २०२० ला प्रस्ताव सादर केला. त्यानुसार पुण्यातील बालेवाडी येथे शुटिंग, सायकलिंग, अ‍ॅथ्लेटिक्स आणि ज्युडो तर नागपूरच्या विभागीय क्रीडासंकुलात अ‍ॅथ्लेटिक्स केंद्र मागितले. अकोला येथील जिल्हा क्रीडासंकुलात बॉक्सिंग तसेच चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुका केंद्रासाठी अ‍ॅथ्लेटिक्स, आर्चरी आणि बॉक्सिंग केद्र मागितले आहे.अर्थात सहा खेळांच्या एकूण नऊ केंद्रांची ही मागणी आहे.

औरंगाबाद विभागात परभणी आणि हिंगोली, लातूर विभागात लातूर शहर आणि नांदेड, कोल्हापूर विभागात कोल्हापूर तसेच सातारा, पुणे विभागात अहमदनगर, नाशिक विभागात जळगाव आणि धुळे, मुंबई विभागात धारावी संकुल तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये खेलो इंडियाची केंद्र असावीत, असे राज्य शासनाला वाटत नाही काय? एकूण लोकसंख्येत महाराष्ट्रच्या संख्येचा वाटा दहा टक्के असून राज्याने विविध खेळात नेहमीच उज्ज्वल कामगिरी केली आहे. आतापर्यंत झालेल्या तीन ‘खेलो इंडिया’ स्पर्धेच्या पदक तालिकेवर नजर टाकल्यास याचा प्रत्यय येईल. पहिल्या आयोजनात महाराष्ट्र दुसऱ्या तर नंतरच्या दोन्ही आयोजनात अव्वल स्थानावर होता. अनेक देशी आणि पारंपरिक खेळांचे माहेरघर अशी राज्याची ओळख आहे. कबड्डी, खोखो, कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन, टेनिसमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे.क्रीडा खाते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, राजकीय नेते यांच्या सन्मवयातून राज्याची मागणी पूर्ण होऊ शकते. मात्र त्यासाठी प्रयत्न आणि पाठपुराव्याची गरज आहे. सर्व खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात किमान १०० केद्र उभारण्याची तयारी असायला हवी, असे कळकळीचे आवाहन भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे संयुक्त सचिव नामदेव शिरगावकर यांनी केले. यासाठी आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय बॉक्सिंग संघटनेचे महासचिव जय कवळी म्हणाले, ‘खेलो इंडियाची अधिकाधिक केंद्र राज्यात क्रीडा संस्कृतीची बीजे रुजवतील. त्यादृष्टीने नवे क्रीडाधोरण तयार व्हायला हवे.’‘बॉक्सिंग हा खेळ गावागावात नेण्याचा प्रयत्न केला. त्याची फलश्रुती म्हणजे खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला मिळालेल्या एकूण पदकात २५ टक्के वाटा बॉक्सिंगचा होता. इतरही खेळांच्या विकासासाठी किमान १०० केंद्र राज्यानेस्थापन करण्याचा अट्टाहास केद्राकडे करावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे.’ -जय कवळी, महासचिव, बीएफआय