शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

कोहली बॉस आहे, तर मग प्रशिक्षकाची काय गरज - ईरापल्ली प्रसन्ना

By admin | Published: June 23, 2017 5:49 PM

माजी भारतीय ऑफ स्पिनर ईरापल्ली प्रसन्ना यांनी विराट कोहलीवर कडक शब्दांत टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 23 - माजी भारतीय ऑफ स्पिनर ईरापल्ली प्रसन्ना यांनी विराट कोहलीवर टीका करत, जर कर्णधाराला आपण भारतीय क्रिकेटचा बॉस आहे असं वाटत असेल, तर मग संघाला प्रशिक्षकाची काय गरज ? असा सवाल विचारला आहे. प्रसन्ना यांना जेव्हा विराट कोहली आणि भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणा-या अनिल कुंबळेबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी कडक शब्दात टीका केली. "कर्णधारच बॉस आहे तर मग त्यांनी प्रशिक्षकाची काय गरज ? मला तर वाटतं त्यांना बॅटिंग आणि फिल्डिंग कोचची देखील गरज नाही", असं ईरापल्ली प्रसन्ना बोलले आहेत. 
 
प्रसन्ना यांनी यावेळी विराट कोहलीच्या कर्णधार क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "कोहली एक चांगला खेळाडू आहे यात काही वाद नाही. मात्र तो एक चांगला कर्णधार आहे की नाही याबद्दल काही बोलू शकत नाही", असं ईरापल्ली प्रसन्ना यांनी सांगितलं. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कोहलीला आपली शिकवण्याची पद्धत आवडत नसल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर केला होता. भारतीय संघ प्रशिक्षकाविनाच वेस्ट इंडिज दौ-यावर गेला आहे. तिथे पाच एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळायचा आहे. 
 
प्रसन्ना यांनी सांगितलं की, "जर कुंबळेसारख्या वरिष्ठ खेळाडूला सन्माननीय वागणूक मिळत नसेल, तर मग मला नाही वाटत की बांगड किंवा श्रीधर यांच्यात इतकी ताकद आहे की ते कोहलीसोबत आत्मविश्वासने संवाद साधतील. यामधील कोणीही कुंबळेइतकं अनुभवी नाही". ते म्हणालेत की, "जर कर्णधाराचं वागणं असंच राहणार असेल, तर कोचची गरज आहे असं मला वाटत नाही".  
 
प्रसन्ना बोलले आहेत की, "जर कोहलीने जबाबदारी घेतली तर पुन्हा एकदा जुने दिवस येतील जेव्हा सर्व गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी मॅनेजरची नियुक्ती केली जायची. कोचची नेमकी भूमिका स्पष्ट नाही करण्यात आली आहे". प्रसन्ना यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "युवराज सिंह आणि महेंद्रसिंग धोनीबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. मला नाही वाटत की 2019 मध्ये होणा-या वर्ल्डकपपर्यंत आपला खेळ कायम ठेवण्यात त्यांना यश मिळेल. तोपर्यंत दोघेही 38 वर्षांचे होतील. आपल्याला नवीन आणि तरुण खेळाडूंची गरज आहे, जे चपळ असतील".
 
प्रसन्ना पुढे बोललेत की, "धोनी विके़टकीपर असेल, मात्र युवराज सिंह एक खेळाडू म्हणून ओझं बनत चालला आहे. वेस्ट इंडिज दौ-यात समोर दुबळा संघ असताना तरुण खेळाडूंची निवड करायला हवं होतं".