शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कुंबळेची विकेट काढली, कोहली आता करून दाखव !

By admin | Published: June 22, 2017 12:01 PM

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवरचा दबाव वाढला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22-  भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवरचा दबाव वाढला आहे. विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाला चांगली कामगिरी करुन दाखवावी लागेल अन्यथा कोहलीला परिणाम  भोगावे लागतील, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.   
 
संघ निवडताना निवड समिती कर्णधाराचे मत विचारात घेते. प्रत्येक कर्णधार त्याच्या पसंतीच्या खेळाडूंना प्राधान्य देतो तसेच प्रशिक्षकाच्या बाबतीतही असते. कोहलीने कुंबळेच्या बाबतीत कर्णधार म्हणून आपले वजन वापरले. त्यामुळे त्यांना प्रशिक्षकपदावरुन पायउतार व्हावे लागले. आता सर्व काही कोहलीच्या मनासारखे घडले असले तरी, त्याच्यावरची जबाबदारी दुप्पटीने वाढली आहे. त्याला आता परफॉर्मन्स करुन दाखवावाच लागेल. 
 
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर लंडनमध्ये बीसीसीआय पदाधिकारी आणि सल्लागार समितीमध्ये बैठक झाली. यावेळी कोहलीने कुंबळेंबरोबर मतभेद असल्याचे मान्य केलं.  कुंबळेबरोबर काम करायला भाग पाडलं जाणार असेल तर आपण तयार आहोत असंही कोहलीने या बैठकीत स्पष्ट केलं होते. जेव्हा सल्लागार समितीचे सदस्य सचिन, सौरव, लक्ष्मण कुंबळेला भेटले तेव्हा त्याने आपल्याला विराटपासून कोणतीही अडचण नसून, आपण त्याच्यासोबत काम करायला तयार आहोत असं सांगितलं.
 
बैठकीनंतर सल्लागार समितीने अॅडमिनिस्ट्रेशन कमिटीसमोर संपूर्ण प्रकरण मांडलं. भविष्यात जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं? असा सवाल उपस्थित झाला. तसंच विराट आणि कुंबळे या दोघांमधील वादाचं हे प्रकरण इतक्या टोकापर्यत का पोहचू दिलं.  वादाच्या सुरुवातीलाच बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी वाद मिटविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, असे सवाल सीओएने उपस्थित केले. सल्लागार समितीने अनिल कुंबळे यांचं प्रशिक्षक पद कायम ठेवावं यासाठी प्रयत्न केले होते पण विराटला कुंबळेंबद्दल तक्रारी असल्याने त्यांनी सन्मानपूर्वक पद सोडण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली आहे. 
 
सूत्रांच्या माहितीनूसार, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर अनिल कुंबळे भारतीय संघाच्या काही खेळाडूंशी बोलले होते. वाइड आणि नोबॉल्स टीमला किती भारी पडले, हे कुंबळे यांनी टीमला सांगितलं. गोलंदाजांनी योग्य आणि ठरलेल्या पद्धतीने गोलंदाजी केली नाही, असं मत कुंबळे यांनी मांडलं होतं. त्यांच्या या मताला त्यावेळी विराट कोहलीने सहमती दर्शविली होती. सामन्याच्या आधी सराव करताना जी स्ट्रॅटेजी ठरविण्यात आली होती तीच मैदानात वापरायला हवी होती, असं मत त्यावेळी विराटने व्यक्त केलं होतं. कोच कुंबळेंचं म्हणणं तेव्हा विराटने सकारात्मकपणे घेतलं होतं.  चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना संपल्यानंतर लगेचच अनिल कुंबळे यांनी खेळाडुंशी संवाद साधला होता.  मोठी मॅच हारल्यानंतर त्यांनी खेळाडुंशी लगेच संवाद साधायला नको होता, तिथूनच वादाला सुरूवात झाली, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.