शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

लक्ष्मणची ५0 वर्षांतील सर्वोत्तम खेळी

By admin | Published: January 04, 2016 11:55 PM

भारताचा संकटमोचक राहिलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणची आॅस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवली गेलेली २८१ धावांची खेळी ही गेल्या ५0 वर्षांच्या

मुंबई : भारताचा संकटमोचक राहिलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणची आॅस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवली गेलेली २८१ धावांची खेळी ही गेल्या ५0 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी म्हणून गणली गेली आहे.हैदराबादच्या या शैलीदार फलंदाजाने भारत पहिल्या डावात २७४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर ही खेळी केली होती. खेळाडू, समालोचक आणि पत्रकारांनी केलेल्या मतदानात लक्ष्मणची ही खेळी गेल्या ५0 वर्षांतील सर्वोत्तम खेळी असल्याचे स्पष्ट झाले. ईएसपीएनच्या डिजिटल पत्रिका क्रिकेट मंथलीच्या जानेवारी अंकात या मतगणनेच्या आधारावर ५0 वर्षांतील कामगिरींचा उल्लेख करण्यात आला आहे.लक्ष्मणने भारताच्या पहिल्या डावाच्या १७१ धावसंख्येत सर्वाधिक ५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्यात आले. त्यानंतर त्याने आपल्या जादुई कामगिरीने जगभरातील क्रिकेटप्रेमींनी मंत्रमुग्ध केले होते. त्याने राहुल द्रविड (१८0) याच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ३७६ धावांची मॅरेथॉन भागीदारी केली होती. आॅस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने या डावाचे स्मरण करताना म्हटले की, ‘मी पायाने झालेल्या निशाण्यावर गोलंदाजी करीत होतो आणि लक्ष्मण तो चेंडू कव्हर अथवा मिडविकेटवर खेळत होता. त्या वेळेस गोलंदाजी करणे कठीण होते.’रिकी पाँटिंग या खेळीविषयी म्हटला की, ‘त्याने लेगसाईडवर मारलेल्या फटक्याने आम्ही सर्व आश्चर्यचकित होतो. आम्ही त्याच्यासाठी जवळपास दोन दिवस गोलंदाजी केली आणि तोपर्यंत त्याला आम्ही बाद करू शकत नाही, असे वाटत होते.’(वृत्तसंस्था)बॉर्डर-गावसकर चषक कसोटी क्रमांक १५३५भारत दुसरा डाव : व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ६३१ मिनिट, ४५२ चेंडू, ४४ चौकार, २८१ धावा.या कसोटीत भारताचा पहिला डाव १७१ धावांत संपुष्टात आल्यानंतर आॅस्ट्रेलियाकडून फॉलोआॅन मिळाला होता. (आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या २४५ धावा झाल्या होत्या.) दुसऱ्या डावांत भारताने ७ बाद ६५७ धावा केल्या होत्या. राहुल द्रविडने या डावात १८० धावांची खेळी केली होती.