शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

कर्णधारांनी नेतृत्व कौशल्याने छाप सोडली

By admin | Published: May 19, 2017 2:49 AM

यंदाच्या आयपीएलच्या पर्वात संघाच्या कर्णधारांचे नेतृत्व कौशल्य दखल घेण्यासारखे आहे. कर्णधारांचा त्यांच्या संघावरील प्रभाव प्रशंसेस पात्र आहे. अचूक चाल रचून

- सुनील गावसकर लिहितात...यंदाच्या आयपीएलच्या पर्वात संघाच्या कर्णधारांचे नेतृत्व कौशल्य दखल घेण्यासारखे आहे. कर्णधारांचा त्यांच्या संघावरील प्रभाव प्रशंसेस पात्र आहे. अचूक चाल रचून किंवा स्वत: उल्लेखनीय योगदान देत संघसहकाऱ्यांपुढे ते उदाहरण सादर करीत आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये खेळ वेगाने बदलत असल्यामुळे कर्णधाराला विशेष काही करता येत नसल्याचे निदर्शनास येते. यंदाच्या मोसमात मात्र चणाक्ष नेतृत्वामुळे कर्णधार सामना आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यात कर्णधार कधी गोलंदाजीमध्ये बदल करीत किंवा क्षेत्ररक्षणात बदल करीत किंवा फलंदाजी क्रमामध्ये बदल करीत सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने वळविण्यात यशस्वी ठरल्याचे निदर्शनास आले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने तीन फलंदाज एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर, संघ अडचणीत असताना शानदार फलंदाजी करीत संघाला चमकदार विजय मिळवून दिला. त्याआधी, त्याने गोलंदाजीमध्ये अचूक बदल करीत फॉर्मातील आक्रमक फलंदाजांचा समावेश असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला केवळ १२८ धावांत रोखण्याची कामगिरी केली. डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल दोन स्थानावर आहेत; पण गंभीरने गोलंदाजीमध्ये अचूक बदल करीत त्यांच्यासह सनरायझर्सच्या अन्य फलंदाजांना जम बसविण्याची संधी दिली नाही. स्टीव्ह स्मिथनेही शानदार नेतृत्व करीत पुणे संघाला अंतिम फेरी गाठून दिली. त्याला महेंद्रसिंह धोनीची योग्य साथ लाभली हे वेगळे सांगायला नको. यष्टिरक्षणाची भूमिका बजावताना धोनी क्षेत्ररक्षकांना योग्य जागेवर तैनात राहण्याचा सल्ला देत होता. डेव्हिड वॉर्नरची कर्णधार म्हणून कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. कर्णधार व उपकर्णधार खेळाबाबत अचूक विचार करीत आहेत, ही आॅस्ट्रेलियन क्रिकेटसाठी चांगली बाब आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना फलंदाजांची कामगिरी उंचावेल, अशी मुंबई इंडियन्स संघाला आशा आहे. रोहित शर्माला चुकीच्या पद्धतीने बाद ठरविण्यात आले असले, तरी फलंदाजी क्रमामध्ये केलेला बदल मुंबई संघासाठी लाभदायक ठरला नाही. बाद फेरीच्या लढतींमध्ये अशा प्रकारच्या निर्णयामुळे सामन्याचे चित्र बदलू शकते आणि मुंबई संघाबाबत तेच घडले. मुंबई संघाला डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. डावाच्या अखेरच्या टप्प्यात सामना मुंबई संघापासून दूर गेला. बुमराहने अखेरचे दोन चेंडू अप्रतिम यॉर्कर टाकले, पण त्यापूर्वी त्याच्या त्या षटकात दोन षटकार लगावल्या गेले होते. यंदाच्या मोसमात साखळी फेरीमध्ये मुंबईने दोन्ही लढतींमध्ये कोलकाता संघाचा पराभव केला आहे, पण कोलकाता संघाने त्यानंतर चमकदार कामगिरी करीत आगेकूच केली आहे. त्यामुळे उभय संघांदरम्यान शुक्रवारी खेळल्या जाणारी लढत चुरशीची होईल. (पीएमजी)