शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

लॉर्ड्सचे यश इशांतला आणखी परिपक्व बनवेल

By admin | Published: July 25, 2014 1:13 AM

लॉर्डसवर 28 वर्षानंतर भारताची विजयी पताका फडकवण्यात सिंहाचा वाटा उचलणारा ईशांत शर्माने अपेक्षेचे एव्हरेस्ट पेलले असले, तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत,

लॉर्डसवर 28 वर्षानंतर भारताची विजयी पताका फडकवण्यात सिंहाचा वाटा उचलणारा ईशांत शर्माने अपेक्षेचे एव्हरेस्ट पेलले असले, तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत, तो म्हणतो, मी बळी मिळवले म्हणून लोक माझा उदोउदो करीत आहेत. पण समजा याउलट घडले असते, मला बळी मिळाले नसते किंवा मी धावा दिल्या असत्या, तर मला जयजयकाराऐवजी शिव्याशाप मिळाल्या असत्या. पण, मी सातत्याने बाउन्सरचा मारा करीत होतो, तेही 80 हून जास्त षटके वापर झालेल्या चेंडूने. हे सोपे काम नाही. बीसीसीआय टीव्हीशी बोलताना ईशांत सांगत होता. मी आता परिपक्व झालो आहे. कोणीही काहीही म्हंटले, तरी मला फारसा फरक पडत नाही. माङो सहकारी माङयावर विश्वास ठेवतात. मी काय करु शकतो, हे त्यांना माहीत आहे. 
त्याच्या या प्रतिक्रियेने त्याच्या आयुष्यातील वेदना कळू शकते. भारतीय क्रिकेट संघातील  स्थान हे त्याच्यासाठी मोरपिसांच्या गादीइतके सुखदायक नाही, हे सिद्ध होते. 2007 साली 19व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केलेल्या ईशांतचे करियर चढ-उताराने भरलेले आहे. पदार्पणात ईशांतकडून खूप अपेक्षा केल्या जात होत्या. 2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौ:यात त्याच्या एका कृतीने भारताला एका महान विजयाची नोंद करता आली. पर्थमधील कसोटी सामन्यात कर्णधार कुंबळेने त्याला ‘और एक ओव्हर करेगा’ असे विचारले, असता त्याने ‘हां मैं करुंगा असे उत्तर दिले. पर्थवरील उन्हात त्याने ते षटक टाकताना वेग आणि स्टॅमिना याच्याशी तडजोड न करता जीव तोडून गोलंदाजी केली. याचे फळ त्याला लगेच मिळाले, पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज रिकी पाँटिंगची विकेट त्याने काढली. हा त्या सामन्यातील टर्निग पॉईंट होता. हा सामना भारताने जिंकून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 
तथापि यशाच्या अधून मधून सरी बरसणारा इशांत शर्मा कायमस्वरुपी भरवशाचा कधी वाटत नव्हता. तो त्याच्या कामाशी अतिशय प्रामाणिक असतो. चुका सुधारण्यासाठी सतत परिश्रम करतो, पण तो विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीसारखा संघाचा हुकमी एक्का कधी बनला नाही.
त्याच्या आठ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने 57 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 37.4 च्या सरासरीने 174 बळी घेतले आहेत. डावात पाच बळी मिळवण्याची किमया त्याने 6 वेळा केली आहे. तर एकदा त्याने सामन्यात दहा बळी मिळविले आहेत. यावरुन त्याचा फॉर्म हा वळवाच्या पावसासारखा बेभरवशाचा असल्याचे दिसून येते. म्हणूनच संघातील त्याच्या स्थानावर टीकाकार प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. विदर्भाच्या उमेश यादवऐवजी ईशांतची निवड झाल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला होता. पण या सर्वांवर मात करणारी एक शक्ती त्याच्याकडे आहे, ती म्हणजे कर्णधार धोनीचा त्याच्यावर असलेला विश्वास. त्याच्यावर आम्ही खूप इनव्हेस्टमेंट केली असल्याचे धोनी सांगतो. इशांतची स्ट्रेंथ त्याच्या कर्णधाराला माहीत होती. लॉर्ड्स कसोटीत त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला.