शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

भावुक विराटने लय गमावली

By admin | Published: April 01, 2017 1:10 AM

आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत कर्णधार विराट कोहली भावनेच्या आहारी गेल्यामुळे फलंदाजीतील लय गमावली. कर्णधार या

दुबई : आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत कर्णधार विराट कोहली भावनेच्या आहारी गेल्यामुळे फलंदाजीतील लय गमावली. कर्णधार या नात्याने कुठल्याही स्थितीत विजय मिळवायचाच असा निर्धार केल्यामुळे विराटवर भावनांचे ओझे झाले असावे. विराट शांतचित्ताने पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यास सज्ज होईल, अशी अपेक्षा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने व्यक्तकेली आहे.आयसीसीच्या वेबसाईटवरील विशेष स्तंभात गांगुलीने लिहिले, ‘आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजयासाठी विराट इतका उत्सुक होता की, भावनेच्या भरात स्वत:च्या फलंदाजीची ‘वाट’ लावली. त्यासाठी हा धडा आहे. इतका प्रभावशाली फलंदाज संपूर्ण मालिकेत ‘फ्लॉप’ ठरल्याचे शल्य मलादेखील आहे. तो शांत होईल आणि मोठी खेळी करेल, अशी मी अपेक्षा बाळगतो.’मालिकेआधी कोहली जबर फॉर्ममध्ये होता. सलग चार मालिकांमध्ये दुहेरी शतके ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज बनला होता. सध्याच्या सत्रात १३ सामन्यांत त्याच्या नावावर १४५७ धावांची नोंद झाली. आॅस्ट्रेलियाविरुद्ध मात्र तीन सामन्यांतील पाच डावांत ००, १३, १२, १५ आणि ६ अशा केवळ ४६ धावा काढू शकला. खांद्याच्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटीत विराटला मुकावे लागले होते.हाच धागा पकडून गांगुली म्हणाला, ‘माझ्यासाठी विराटच्या दोन भूमिका आहेत. एक फलंदाज आणि दुसरा कर्णधार. फलंदाज म्हणून त्याच्यात धावा काढण्याची भूक आहे. कर्णधार म्हणूनही तो जिद्दी स्वभावाचा आहे. दररोज विजय मिळविण्याची जिद्द त्याच्यात आहे, पण दररोज जिंकणे शक्य नाही, हे विराटने डोक्यात ठेवायला हवे.’या मालिकेतून रवींद्र जडेजा, लोकेश राहुल आणि उमेश यादव, चेतेश्वर पुजारा यांचा आत्मविश्वास बळावल्याचे सांगून गांगुली पुढे म्हणाला, ‘विदेशात मालिका जिंकण्यासाठी या खेळाडूंची फार मोठी मदत होणार आहे. सध्याच्या भारतीय संघात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात विजय मिळविण्याची क्षमता आहे. मागच्या १३ कसोटींचा निकाल पाहिल्यानंतर विराट अ‍ॅन्ड कंपनी आता भारताबाहेर विजयाचा ध्वज उंचावेल, यात शंका नाही. धरमशाला कसोटीबद्दल गांगुली लिहितो, ‘मी तिसऱ्या दिवशी घरी टी.व्ही. पाहात असताना आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव उमेश आणि भुवनेश्वर यांच्या वेगवान माऱ्यापुढे कोसळायला सुरुवात झाली. विराट आणि कुंबळे यांनी मैदानाबाहेरून दिलेल्या पाठिंब्यामुळे आॅस्ट्रेलियाला अनुकूल असलेल्या स्थितीत भारताचा विजय साकार झाला. याचे श्रेय सांघिक परिश्रमांना द्यायला हवे.’ (वृत्तसंस्था)