शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

एम. एस. धोनी भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार

By admin | Published: August 28, 2015 1:05 AM

महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कर्णधार असल्याचे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने व्यक्त केले. एसजेएएनतर्फे (नागपूर क्रीडा पत्रकार संघटना)

नागपूर : महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कर्णधार असल्याचे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने व्यक्त केले. एसजेएएनतर्फे (नागपूर क्रीडा पत्रकार संघटना) आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेला श्रीनाथ पत्रकारांसोबत वार्तालाप कार्यक्रमात बोलत होता.भारतीय क्रिकेटमधील यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या श्रीनाथने धोनीच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. श्रीनाथ म्हणाला, ‘‘धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटच्या तीन स्वरूपांमध्ये (कसोटी, वन-डे, टी-२०) यशाचे शिखर गाठले. वन-डे व टी-२० मध्ये विश्वविजेतेपद पटकाविण्या व्यतिरिक्त भारताने कसोटी क्रिकेटमध्येही अव्वल स्थान पटकावले.’’ निर्णायक क्षणी संघाला यश मिळवून देणे यशस्वी कर्णधाराचे गमक असते. त्यात धोनी सर्वांत यशस्वी ठरला आहे. विद्यमान कसोटी कर्णधार कोहलीबाबत हा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला, ‘‘विराट आक्रमक कर्णधार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वत:ची विशेषता असते. त्यामुळे कुणाएका खेळाडूची दुसऱ्या खेळाडूशी तुलना करता येणार नाही. कोहली भारतीय क्रिकेटमध्ये यशस्वी कर्णधार ठरेल, असा विश्वास आहे. अनुभवाने तो परिपक्व होईल.’’कसोटी क्रिकेटमध्ये ५ गोलंदाजांच्या रणनीतीचे श्रीनाथने समर्थन केले. श्रीनाथ म्हणाला, ‘‘एक गोलंदाज म्हणून मला असे वाटते, की संघात ५ स्पेशालिस्ट गोलंदाज असणे आवश्यक आहे; पण सर्व काही कर्णधारावर अवलंबून आहे. फलंदाज असलेल्या कर्णधाराची एक अतिरिक्त फलंदाज खेळविण्यास पसंती असते.’’श्रीनाथ म्हणाला, ‘‘विदेशातील खेळपट्ट्यांवर यश मिळविण्यासाठी तेथील परिस्थितीसोबत जुळवून घेणे महत्त्वाचे ठरते. त्यात सर्वच संघांतील खेळाडूंना अडचण भासत असल्याचे दिसून येते.’’ (क्रीडा प्रतिनिधी)